शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

By हरी मोकाशे | Updated: June 21, 2023 18:21 IST

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना

लातूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास काही प्रमाणात आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होईल, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक विवंचनेस सामोरे जावे लागते. एखाद्या शासकीय योजनेचा लाभ देऊन त्यांच्या कुटुंबास आर्थिक बळकटी देता येऊ शकते म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी शासनाच्या विविध योजना राबविताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पाच विभागांवर विशेष लक्ष...मनरेगाअंतर्गत गायगोठा, सिंचन विहीर, फळबाग लागवड, कृषी विभागाअंतर्गत बायोगॅस, सिंचन विहीर, कडबाकुट्टी, पेरणी यंत्र, बी- बियाणे वाटप, समाजकल्याण विभागाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश, शिष्यवृत्तीचा लाभ, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत घरकुल आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट, शेळी गट वाटप. अशा योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या आहेत.

दिरंगाई होऊ नये...शासनाच्या विविध योजना राबविताना प्राधान्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना लाभ द्यावा. त्यानुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. या कामासंदर्भात विलंब, दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या