शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कौतुकास्पद पाऊल,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ

By हरी मोकाशे | Updated: June 21, 2023 18:21 IST

कुटुंबांच्या आर्थिक स्थिरतेसाठी लातूर सीईओंच्या सूचना

लातूर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास काही प्रमाणात आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य होईल, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक विवंचनेस सामोरे जावे लागते. एखाद्या शासकीय योजनेचा लाभ देऊन त्यांच्या कुटुंबास आर्थिक बळकटी देता येऊ शकते म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी शासनाच्या विविध योजना राबविताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पाच विभागांवर विशेष लक्ष...मनरेगाअंतर्गत गायगोठा, सिंचन विहीर, फळबाग लागवड, कृषी विभागाअंतर्गत बायोगॅस, सिंचन विहीर, कडबाकुट्टी, पेरणी यंत्र, बी- बियाणे वाटप, समाजकल्याण विभागाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश, शिष्यवृत्तीचा लाभ, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत घरकुल आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट, शेळी गट वाटप. अशा योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या आहेत.

दिरंगाई होऊ नये...शासनाच्या विविध योजना राबविताना प्राधान्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना लाभ द्यावा. त्यानुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. या कामासंदर्भात विलंब, दिरंगाई अथवा टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या