शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

पावसाची उघडीप, कोवळी पिके वन्यप्राण्यांकडून फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST

औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात मृगाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी ...

औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात मृगाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी करून खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली. मृगात पेरणी झाल्यास पीक चांगले येते आणि उत्पादन चांगले मिळते, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, पिकेही उगवली आहेत. परंतु, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. दरम्यान, हरणांचे कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून ते फस्त करीत आहेत. तसेच रानडुकरे पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याची भीती आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतात थांबत असल्याचे पहावयास मिळत आहे.

ढग येतात दाटून...

मृगाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाऊस गायब झाला आहे. पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, परंतु सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

शेतकऱ्यांची चिंता वाढली...

जूनच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनची पेरणी केली. पीकही उगवले. परंतु, पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे रात्रभर जागरण करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- सुरज पाटील, शेतकरी, बेलकुंड.