शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

उदगीर : आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने ...

उदगीर : आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अरुण खरात यांनी व्यक्त केले.

येथील मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित कोविड-१९ महामारी जनजागरण आरोग्य अभियान सप्ताहांतर्गत ‘कोविडोत्तर शारीरिक व मानसिक समस्या आणि उपाय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. यावेळी परिषदेचे माजी पदाधिकारी प्रा. सुभाष बडीहवेली, प्रा. रमाकांत मध्वरे उपस्थित होते.

यावेळी डॉ. खरात म्हणाले, कोरोना झाल्यानंतर न घाबरता हिमतीने मुकाबला केला पाहिजे. भारतीयांच्या बदलत्या व चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण या प्रादुर्भावाला सहज बळी पडत आहोत. दर सहा महिन्याला आरोग्यविषयक तपासणी करून घेतल्यास भविष्यातील धोक्याची सूचना मिळू शकते. मानसिक तणाव न घेता दररोज व्यायाम करणे, पालेभाज्या व फळांचा आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यासोबतच शारीरिक मेहनतीची कामेसुद्धा आवश्यक आहेत. कोरोना झाल्यावर व नंतर मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे. मन खंबीर आणि शरीर तंदुरुस्त असल्यास कोणतीही व्याधी सहजासहजी होत नाही. उत्तम व्यायाम, सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. उर्मिला शिरसी यांनी केले तर प्रा. डॉ. संजय निटुरे यांनी आभार मानले.