शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अ‍ॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टिका : अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Updated: January 14, 2017 16:24 IST

खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ?

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 -  खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ? या मुद्यावरुन टीकेचे लक्ष्य केले, अशी खंत विख्यात विधिज्ञ व विशेष सरकारी वकील अ‍ॅड़उज्वल निकम यांनी शनिवारी लातुरात व्यक्त केली़ ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी अ‍ॅड़उज्वल निकम यांच्या हस्ते लातुरात झाले़ यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
 
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिका डॉ़प्रज्ञा दया पवार होत्या़ तर ज्येष्ट साहित्यिक गंगाधर पानतावणे, डॉ़ जनार्दन वाघमारे, रविचंद्र हडसनकर, जि़ प़ चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मसापचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, लेखिका संध्या रंगारी यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ 
 
पुढे बोलताना अ‍ॅड़ निकम म्हणाले, खैरलांजी प्रकरणात जी अमानुषता दिसली, त्याने जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा विचार मनात आला़ अशाच नाउमेद करणाºया घटना आपल्या आसपास सध्या वाढल्या आहेत़ उपेक्षितांच्या हालअपेष्टांची जाणीव, संवदेना ठेवून साहित्यिकांचे लिखाण झाल्यास हरवत चाललेली उमेद पुन्हा जागेल. समाज बदलण्यासाठी देव जन्म घेणार नाही़ उपास-तपासाने परिवर्तन होणारे नाही़ ते साहित्यातूनच घडेल़ समता, बंधुता व न्याय ही बाबासाहेबांनी सांगितलेली मूल्ये ज्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात, तोच खरा साहित्यिक़ अशा साहित्यातील विचार जगता आले पाहिजे़त तेव्हाच बाबासाहेबांच्या विचारातील राष्ट्र घडेल.  
 
यावेळी बोलताना माजी खासदार डॉ़जनार्दन वाघमारे म्हणाले, संत साहित्याने भक्तीयुग तयार केले आहे़ तर दलित साहित्याने क्रांतीयुग तयार केले़ अशा या साहित्याला प्रेरणा देण्याचे कार्य गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून सातत्याने कले आहे़ राज्यभरातील साहित्यिकांची उपस्थिती लाभलेले हे संमेलन रविवारी रात्रीपर्यंत रंगणार आहे.  विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने हे संमेलन भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी आहे. 
 
अ‍ॅड. निकमांकडून अ‍ॅट्रासिटीचा विचार व्हायलाच हवा होता : संमेलनाध्यक्षा डॉ़ प्रज्ञा दया पवार 
संमेलनाध्यक्ष डॉ़प्रज्ञा दया पवार यांनी अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी मांडलेल्या खैरलांजी प्रकरणातील काही भूमिकेस आपल्या अध्यक्षीय भाषणात तत्काळ खोडून काढले़ त्या म्हणाल्या, या प्रकरणात अंतर्भूत करता येणाºया काही बाबी झाल्या नाहीत़ दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच महिलांवरील शारीरिक अत्याचारावर काहीच विचार झाला नाही़ या प्रकरणाचा विचार करता या सर्व सुट्या भागांचा विचार होणे आवश्यक होते़ निकम यांनी यावर सविस्तर बोलले पाहिजे होते़ परंतु, त्यांनी कायद्याच्या चौकटीत आपली बाजू प्रमाणिकपणे मांडली असावी़
 
प्रा. कृष्णा किरवले, प्राचार्य संध्या रंगारी पुरस्काराने सन्मानित 
अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या वतीने संमेलनात लेखकांना देण्यात येणाºया पुरस्कारांचे वितरणही झाले़ यंदाचा ‘ज्येष्ठ लेखक पुरस्कार’ कृष्णा किरवले यांना तर ‘ज्येष्ठ लेखिका पुरस्कार’ प्राचार्य संध्या रंगारी यांना देवून सन्मानित करण्यात आले़ 
 
संविधान रॅलीने दिला समतेचा संदेश 
सकाळी-सकाळी सुर्यदेवाचे स्वागत करताना आपल्या पारंपारिक नृत्याने मनावर मोहिनी घालणारे वासुदेव... महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेणारी लहान मुले, विविध शाळकरी मुले आणि  कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेली संविधान ग्रंथ रॅलीने ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा आगाज सोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमधून दयानंद महाविद्यालयातील साहित्यनगरीपर्यंत निघालेल्या संविधान रॅलीने शनिवारी सकाळी अवघ्या लातुरकरांचे लक्ष वेधून घेतले.