शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा

By संदीप शिंदे | Updated: September 30, 2024 16:59 IST

भूकंतग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करून विशेष पॅकेज देण्याची मागणी

- सूर्यकांत बाळापुरे

किल्लारी ( लातूर) : ३० सप्टेंबर-१९९३ साली झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे काही क्षणात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ३० वर्षांनंतरही या घटनेच्या आठवणी काढल्यानंतर अंगावर शहारे येतात अन् तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. या विध्वंसक घटनेनंतर पुनर्वसन झाले. मात्र, आजही मूलभूत सुविधांची वानवा असल्याने व्यथा कायम आहेत. तसेच कायमस्वरुपी घरे, लातूर- धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांचा विशेष किल्लारी तालुका करुन पॅकेज देण्याचे आश्वासन, भूकंपग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे.

३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उषःकाल होता होता काळरात्र झाली होती. ३० ते ३५ सेकंदात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजला होता. हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर पशुधनासह पशु, पक्षी आणि अनेक जीवांना प्राणास मुकावे लागले होते. त्या घटनेला आज ३१ वर्षे पुर्ण होत आहे. त्यामुळे किल्लारी आणि परिसरातील गावामध्ये बाजारपेठ बंद ठेवून काळा दिवस पाळला जातो. आज ३१ वर्षांनंतरही गावात पाण्याची समस्या कायम आहे. विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, भूकंपग्रस्त मुलांना दुखातून सावरण्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार विनाअट परीक्षा न देता सेवेत सामावून घ्यावे असे आदेश निघाले होते. मात्र, पूढे त्यास अडथळा आणून तीन टक्के आरक्षण केले. त्याचाही फायदा अनेकांना झालाच नाही. परिणामी, अनेकांची वये सरली मात्र, अद्यापही नोकरीचा पत्ताच नाही. आजही ३० सप्टेंबर म्हंटले की अंगावर शहारे येतात. त्यामुळे किल्लारी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

५२ गावांचा तालुका करून विशेष पॅकेज द्यावे...भुकंपग्रस्त महामंडळ स्थापन करून १००० कोटींचा निधी देऊन रोजगार निर्मिती करावी, भूकंपग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करावा, भूकंपग्रस्तांसाठी एमआयडीसीत ५ टक्के जागा राखीव ठेवावी, किल्लारी ते एकोंडी रस्त्यावरील तेरणा नदीवर पूल करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा, गावांतर्गत रस्ते, गटारी, सभागृह याची दुरुस्ती करावी. १९९४ पासून आजतागायत भुंकपग्रस्तांचा नोकरी अनुशेष भरून काढावा, किल्लारीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा आदी मागण्या कायम आहेत.

छताला गळती, भूकंपमापक यंत्र नाही...किल्लारीत पुनर्वसनानंतर पक्की घरे बांधून देण्यात आली. मात्र, आता पावसाळ्यात या घरांच्या छताला गळती लागत आहे. काही घरांचा गिलावा गळत आहे. त्यामुळे विटा उघड्या पडत आहेत. तसेच किल्लारी येथे दोन एकरवर भूकंप मापन केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. मात्र, अद्यापही तिथे यंत्र बसविण्यात आले नाही. परिणामी, इमारतीची मोडतोड झाली आहे. हे यंत्र कधी उभारणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :laturलातूरEarthquakeभूकंप