शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

३१ वर्षांनंतरही किल्लारीकरांच्या व्यथा कायम; आजही मूलभूत सुविधांची वानवा

By संदीप शिंदे | Updated: September 30, 2024 16:59 IST

भूकंतग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करून विशेष पॅकेज देण्याची मागणी

- सूर्यकांत बाळापुरे

किल्लारी ( लातूर) : ३० सप्टेंबर-१९९३ साली झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे काही क्षणात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ३० वर्षांनंतरही या घटनेच्या आठवणी काढल्यानंतर अंगावर शहारे येतात अन् तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. या विध्वंसक घटनेनंतर पुनर्वसन झाले. मात्र, आजही मूलभूत सुविधांची वानवा असल्याने व्यथा कायम आहेत. तसेच कायमस्वरुपी घरे, लातूर- धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांचा विशेष किल्लारी तालुका करुन पॅकेज देण्याचे आश्वासन, भूकंपग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे.

३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे गणेश विसर्जन करुन शांत झालेल्या किल्लारी व परिसरात उषःकाल होता होता काळरात्र झाली होती. ३० ते ३५ सेकंदात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजला होता. हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर पशुधनासह पशु, पक्षी आणि अनेक जीवांना प्राणास मुकावे लागले होते. त्या घटनेला आज ३१ वर्षे पुर्ण होत आहे. त्यामुळे किल्लारी आणि परिसरातील गावामध्ये बाजारपेठ बंद ठेवून काळा दिवस पाळला जातो. आज ३१ वर्षांनंतरही गावात पाण्याची समस्या कायम आहे. विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. दरम्यान, भूकंपग्रस्त मुलांना दुखातून सावरण्यासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार विनाअट परीक्षा न देता सेवेत सामावून घ्यावे असे आदेश निघाले होते. मात्र, पूढे त्यास अडथळा आणून तीन टक्के आरक्षण केले. त्याचाही फायदा अनेकांना झालाच नाही. परिणामी, अनेकांची वये सरली मात्र, अद्यापही नोकरीचा पत्ताच नाही. आजही ३० सप्टेंबर म्हंटले की अंगावर शहारे येतात. त्यामुळे किल्लारी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

५२ गावांचा तालुका करून विशेष पॅकेज द्यावे...भुकंपग्रस्त महामंडळ स्थापन करून १००० कोटींचा निधी देऊन रोजगार निर्मिती करावी, भूकंपग्रस्त ५२ गावांचा किल्लारी तालुका करावा, भूकंपग्रस्तांसाठी एमआयडीसीत ५ टक्के जागा राखीव ठेवावी, किल्लारी ते एकोंडी रस्त्यावरील तेरणा नदीवर पूल करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवावा, गावांतर्गत रस्ते, गटारी, सभागृह याची दुरुस्ती करावी. १९९४ पासून आजतागायत भुंकपग्रस्तांचा नोकरी अनुशेष भरून काढावा, किल्लारीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा आदी मागण्या कायम आहेत.

छताला गळती, भूकंपमापक यंत्र नाही...किल्लारीत पुनर्वसनानंतर पक्की घरे बांधून देण्यात आली. मात्र, आता पावसाळ्यात या घरांच्या छताला गळती लागत आहे. काही घरांचा गिलावा गळत आहे. त्यामुळे विटा उघड्या पडत आहेत. तसेच किल्लारी येथे दोन एकरवर भूकंप मापन केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. मात्र, अद्यापही तिथे यंत्र बसविण्यात आले नाही. परिणामी, इमारतीची मोडतोड झाली आहे. हे यंत्र कधी उभारणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :laturलातूरEarthquakeभूकंप