शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: May 17, 2024 16:46 IST

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, पाणी काटकसरीने वापर करणे गरजेचे

रेणापूर (लातूर) : अर्ध्या रेणापूर तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे झपाट्याने कमी होत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सद्य:स्थितीत या धरणात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रेणापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी रेणापूर तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांना रेणा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे झपाट्याने होत असलेल्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. तसेच घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव आले आहेत. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

प्रकल्पावर विविध गावांच्या नळ योजना अवलंबून असून, रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्प आणि व्हटी हे दोनच मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर रेणापूर दहाखेडी, पानगाव बाराखडी, कामखेडा पाच खेडी, खरोळा, तसेच बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव यासह ३४ गावांच्या योजना अवलंबून आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात सध्या ३.४० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम सुरू...रेणापूर मध्यम प्रकल्प सद्य:स्थितीत ३.४० टक्के पाणी आहे. पाणी कमी झालेल्या क्षेत्रावरील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदतीने केला जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी एक महिना पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन आहे.

प्रकल्पात १.१४ दलघमी मृत पाणीसाठा...रेणापूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थिती उपयुक्त पाणीसाठा ०.६९८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी एकूण पाणीसाठा १.८२८ दलघमी तर सरासरी ३.४० पाण्याची टक्केवारी आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन रेना प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले. पुढील महिनाभरात पाऊस सुरु होणार असल्याने तोपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

दररोज १० ते ११ एमएमएने बाष्पीभवन...रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यातील काही गावांत अधिग्रहण तर एका गावांत टँकरने पाणीपूरवठा होत आहे. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी