शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

बाष्पीभवन वाढले; रेणा प्रकल्पात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: May 17, 2024 16:46 IST

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, पाणी काटकसरीने वापर करणे गरजेचे

रेणापूर (लातूर) : अर्ध्या रेणापूर तालुक्याची तहान भागविणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे झपाट्याने कमी होत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सद्य:स्थितीत या धरणात केवळ ३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रेणापूर तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी रेणापूर तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांना रेणा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे झपाट्याने होत असलेल्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. तसेच घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव आले आहेत. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

प्रकल्पावर विविध गावांच्या नळ योजना अवलंबून असून, रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्प आणि व्हटी हे दोनच मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर रेणापूर दहाखेडी, पानगाव बाराखडी, कामखेडा पाच खेडी, खरोळा, तसेच बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव यासह ३४ गावांच्या योजना अवलंबून आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात सध्या ३.४० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन झपाट्याने होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम सुरू...रेणापूर मध्यम प्रकल्प सद्य:स्थितीत ३.४० टक्के पाणी आहे. पाणी कमी झालेल्या क्षेत्रावरील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदतीने केला जात आहे. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी एक महिना पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन आहे.

प्रकल्पात १.१४ दलघमी मृत पाणीसाठा...रेणापूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थिती उपयुक्त पाणीसाठा ०.६९८ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी एकूण पाणीसाठा १.८२८ दलघमी तर सरासरी ३.४० पाण्याची टक्केवारी आहे. या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन रेना प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले. पुढील महिनाभरात पाऊस सुरु होणार असल्याने तोपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

दररोज १० ते ११ एमएमएने बाष्पीभवन...रेणापूर तालुक्यातील घनसरगाव, रेणापूर, खरोळा, हे बॅरेज सध्या कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून सिंचन विहीर व बोअर अधिग्रहणाचे तसेच काही ठिकाणी टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यातील काही गावांत अधिग्रहण तर एका गावांत टँकरने पाणीपूरवठा होत आहे. धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज १० ते ११ एमएमने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी