शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: August 3, 2023 17:36 IST

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून लढा सुरु आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने ९ ऑगस्टपासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय तालुका निर्मिती कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

किल्लारी तालुका व्हावा, यासाठी परिसरातील ५२ गावातील ग्रामपंचायतीने लेखी संमतीपत्र दिले आहे. किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, याठिकाणी मोठी बाजारपेठ, बाजार समिती, पोलीस ठाणे, महाविद्यालये, आठ शाळा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असून, दरराेज ५० गावांचा संपर्क किल्लारी गावासोबत असतो. मागील ३० वर्षांपासून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. बैठकीस उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक निवृत्ती भोसले, महादेव पाटील, भाजपाचे प्रकाश पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच विश्वास काळे, सरपंच युवराज गायकवाड, माजी जि.प. सदस्य दिलीप लोहार, अरुण अत्तार, रिपाईचे हरीश डावरे, देविदास पवार, उपसरपंच बाबुराव बिराजदार, सतीष भोसले, रमेश हेळंबे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, डॉ. नोगजा, दिपक पाटील, विजय भोसले, डॉ. राजेश गुजिटे, पप्पु भोसले, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, प्रकाश मिरगे, किशोर भोसले, सचिन माने, विनोद बाबळसुरे, अशोक गावकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार