शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: August 3, 2023 17:36 IST

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून लढा सुरु आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने ९ ऑगस्टपासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय तालुका निर्मिती कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

किल्लारी तालुका व्हावा, यासाठी परिसरातील ५२ गावातील ग्रामपंचायतीने लेखी संमतीपत्र दिले आहे. किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, याठिकाणी मोठी बाजारपेठ, बाजार समिती, पोलीस ठाणे, महाविद्यालये, आठ शाळा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असून, दरराेज ५० गावांचा संपर्क किल्लारी गावासोबत असतो. मागील ३० वर्षांपासून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. बैठकीस उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक निवृत्ती भोसले, महादेव पाटील, भाजपाचे प्रकाश पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच विश्वास काळे, सरपंच युवराज गायकवाड, माजी जि.प. सदस्य दिलीप लोहार, अरुण अत्तार, रिपाईचे हरीश डावरे, देविदास पवार, उपसरपंच बाबुराव बिराजदार, सतीष भोसले, रमेश हेळंबे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, डॉ. नोगजा, दिपक पाटील, विजय भोसले, डॉ. राजेश गुजिटे, पप्पु भोसले, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, प्रकाश मिरगे, किशोर भोसले, सचिन माने, विनोद बाबळसुरे, अशोक गावकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार