शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

किल्लारी तालुका निर्मितीसाठी पुन्हा एल्गार; ९ ऑगस्टपासून रास्तारोको, बेमुदत साखळी आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: August 3, 2023 17:36 IST

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मागील ३० वर्षांपासून लढा सुरु आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने ९ ऑगस्टपासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय तालुका निर्मिती कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

किल्लारी तालुका व्हावा, यासाठी परिसरातील ५२ गावातील ग्रामपंचायतीने लेखी संमतीपत्र दिले आहे. किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव असून, याठिकाणी मोठी बाजारपेठ, बाजार समिती, पोलीस ठाणे, महाविद्यालये, आठ शाळा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असून, दरराेज ५० गावांचा संपर्क किल्लारी गावासोबत असतो. मागील ३० वर्षांपासून मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून रास्ता रोको, बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून जाेपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. बैठकीस उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक निवृत्ती भोसले, महादेव पाटील, भाजपाचे प्रकाश पाटील, माजी उपसभापती किशोर जाधव, चेअरमन किरण बाबळसुरे, माजी सरपंच विश्वास काळे, सरपंच युवराज गायकवाड, माजी जि.प. सदस्य दिलीप लोहार, अरुण अत्तार, रिपाईचे हरीश डावरे, देविदास पवार, उपसरपंच बाबुराव बिराजदार, सतीष भोसले, रमेश हेळंबे, भुकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, डॉ. नोगजा, दिपक पाटील, विजय भोसले, डॉ. राजेश गुजिटे, पप्पु भोसले, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, प्रकाश मिरगे, किशोर भोसले, सचिन माने, विनोद बाबळसुरे, अशोक गावकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार