शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का; वडिलांना वाचवताना मुलाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: October 10, 2024 04:33 IST

औसा ठाण्यात नाेंद : नागरसोगा शिवारातील घटना...

राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : कडबाकुट्टी करताना वडिलांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नागरसाेगा (ता. औसा) शिवारात बुधवारी पहाटे घडली. यामध्ये वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, औसा पाेलिस ठाण्यात याची नाेंद करण्यात आली आहे. शेतकरी तानाजी विश्वनाथ मुसांडे (वय ५०) व त्यांचा मुलगा कृष्णा तानाजी मुसांडे (वय २५) असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे.

औसा तालुक्यातील नागरसाेगा येथील शेतकरी तानाजी आणि मुलगा कृष्णा हे शेतीबराेबरच दुधाचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री त्यांनी शेतातच मुक्काम केला हाेता. बुधवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पशुधनाला चारा म्हणून कडबाकुट्टीचे काम करत हाेते. यावेळी वडिलांना विजेचा धक्का बसला. हे मुलाच्या लक्षात आल्याने त्याने वडिलांना वाचविण्याची धडपड केली असता, त्यालाही विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघाही पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शेतीबराेबरच सुरू हाेता दूध विक्रीचा व्यवसाय...

दाेघांवरच कुटुंबाचा गाडा चालत हाेता. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, जवळगा (पो.) प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. वडील आणि मुलाला उच्च दाबाचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला, असे डॉ. बिलाल मिर्झा यांनी सांगितले.

विजेचा धक्क्याने दाेघांचा जागीच मृत्यू...

मयत वडील-मुलगा नेहमीप्रमाणे रात्री शेतात जागलीला गेले हाेते. पहाटे पशुधनाला चारा टाकण्यासाठी वडिलांनी कडबाकुट्टी सुरू केली. चारा तयार करताना त्यांना विजेचा धक्का बसला. यावेळी लांब थांबलेल्या मुलाच्या लक्षात आले. त्याने वडिलांना वाचविण्यासाठी धडपड केली असता त्यालाही विजेचा धक्का बसला. विजेचा प्रवाह अधिक असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :laturलातूर