शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लातूर मनपा स्थायी समिती सभापतीची निवड रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 19:29 IST

लातूर मनपा स्थायी समिती सभापती व निवडले गेलेल्या ८ सदस्यांची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे.

लातूर : लातूर मनपा स्थायी समिती सभापती व निवडले गेलेल्या ८ सदस्यांची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. दरम्यान, न्यायालयाचा हा निकाल म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा विजय असल्याचे मत काँग्रेस पक्षाने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.लातूर मनपातील स्थायी समिती सभापतींची तसेच ८ सदस्यांची निवड १५ जून रोजी झाली होती. या निवडीस विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, न्यायालयात या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. तो निकाल न्यायालयाने दिला असून, स्थायी समितीचे निवडलेले ८ सदस्य तसेच सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांची निवड रद्द ठरविली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समितीचे मावळते सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली १४ सप्टेंबर रोजी स्थायी समितीची बैठक होईल. त्यात चिठ्ठी टाकून नियमानुसार सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यानंतर १९ सप्टेंबर रोजी नवीन सदस्यांची नियमानुसार बैठक होऊन त्यात नवीन सभापतींची निवड होईल, असे काँग्रेस पक्षाने न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला मनपातील विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, स्थायी समितीचे मावळती सभापती अशोक गोविंदपूरकर, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, माजी महापौर स्मिता खानापुरे, विजय साबदे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अ‍ॅड. किरण जाधव, संजय ओहाळ आदींची उपस्थिती होती. लातूर महापालिकेतील स्थायी समितीचे ८ सदस्य वर्षपूर्तीनंतर २ मे २०१८ रोजी निवृत्त करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन सदस्यांची निवड होऊ शकली नव्हती.आचारसंहिता संपल्यानंतर सदस्य निवडीची अधिसूचना निघाली व १४ जून रोजी सदस्य निवडले गेले. त्यात काँग्रेसचे ८ आणि भाजपाचे ८ असे समसमान निवडले गेले. दरम्यान, स्थायी समितीच्या सभापती निवडीस उशीर झाल्याचे कारण देत महापौरांनी महापालिका अधिनियम २१ (५) चा सोयीचा अर्थ लावून सभापती निवडीचा अधिकार स्थायी समिती सदस्याऐवजी सभागृहातील सदस्यांकडे घेतला. तो बेकायदेशीर होता. या प्रकरणी अ‍ॅड. दीपक सूळ, विजय साबदे यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांची निवड रद्द केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. होन, अ‍ॅड. सी.पी. मोरे, अ‍ॅड. प्रियंदा पाटील यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅड. हणमंत पाटील यांनी सहकार्य केले.

टॅग्स :laturलातूर