शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

By संदीप शिंदे | Updated: April 24, 2023 16:12 IST

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये १६६९ जागा असून, राज्यस्तरावरील सोडतीत १६४८ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चितीसाठी ३० एप्रिलपर्यत मुदत होती. मात्र, त्यास आता ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २०० शाळांची नोंदणी असून, या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ७ हजार ४५१ बालकांचे अर्ज आले होते. त्यानुसार ५ एप्रिल रोजी पुणे येथे राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये १६४८ बालकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या बालकांना २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेशाला अपेक्षित गती न मिळाल्याने शिक्षण संचालकांनी आरटीई प्रवेशासाठी आता ८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या बालकांना आरटीईत निवडीचे संदेश आले आहेत. त्यांनी पंचायत समितीस्तरावर कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ८ मे पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आतापर्यंत ६२ बालकांचे प्रवेश निश्चित...पुणे येथे ५ एप्रिल रोजी सोडत जाहीर झाली होती. त्यानंतर १२ एप्रिलपासुन पालकांना निवडीचे संदेश येत आहेत. मात्र, संदेश आल्यावरही अनेक पालकांनी अद्याप कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित केलेले नाहीत. जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत केवळ ६२ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले होते. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

सोडतीत १ हजार ६४८ बालकांची निवड...जिल्ह्यात आरटीईच्या १६६९ जागा आहेत. मात्र, पुणे येथे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये १६४८ जागांवरच निवड करण्यात आली आहे. मध्यंतरी आरटीईचे पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या अडचणी आता दुर झाल्या आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट अर्ज आले असल्याने अनेक पालकांना सोडतीत निवड न झाल्याने इतर शाळेत बालकांचे प्रवेश निश्चित करावे लागत आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूर