शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

By संदीप शिंदे | Updated: April 24, 2023 16:12 IST

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये १६६९ जागा असून, राज्यस्तरावरील सोडतीत १६४८ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चितीसाठी ३० एप्रिलपर्यत मुदत होती. मात्र, त्यास आता ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २०० शाळांची नोंदणी असून, या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ७ हजार ४५१ बालकांचे अर्ज आले होते. त्यानुसार ५ एप्रिल रोजी पुणे येथे राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये १६४८ बालकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या बालकांना २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेशाला अपेक्षित गती न मिळाल्याने शिक्षण संचालकांनी आरटीई प्रवेशासाठी आता ८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या बालकांना आरटीईत निवडीचे संदेश आले आहेत. त्यांनी पंचायत समितीस्तरावर कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ८ मे पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आतापर्यंत ६२ बालकांचे प्रवेश निश्चित...पुणे येथे ५ एप्रिल रोजी सोडत जाहीर झाली होती. त्यानंतर १२ एप्रिलपासुन पालकांना निवडीचे संदेश येत आहेत. मात्र, संदेश आल्यावरही अनेक पालकांनी अद्याप कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित केलेले नाहीत. जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत केवळ ६२ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले होते. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

सोडतीत १ हजार ६४८ बालकांची निवड...जिल्ह्यात आरटीईच्या १६६९ जागा आहेत. मात्र, पुणे येथे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये १६४८ जागांवरच निवड करण्यात आली आहे. मध्यंतरी आरटीईचे पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या अडचणी आता दुर झाल्या आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट अर्ज आले असल्याने अनेक पालकांना सोडतीत निवड न झाल्याने इतर शाळेत बालकांचे प्रवेश निश्चित करावे लागत आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूर