शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आरटीई प्रवेश निश्चित करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ

By संदीप शिंदे | Updated: April 24, 2023 16:12 IST

राज्यस्तरावरील सोडतीत १६६९ जागांसाठी १६४८ बालकांची निवड

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २०० शाळांमध्ये १६६९ जागा असून, राज्यस्तरावरील सोडतीत १६४८ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चितीसाठी ३० एप्रिलपर्यत मुदत होती. मात्र, त्यास आता ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २०० शाळांची नोंदणी असून, या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ७ हजार ४५१ बालकांचे अर्ज आले होते. त्यानुसार ५ एप्रिल रोजी पुणे येथे राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली. त्यामध्ये १६४८ बालकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या बालकांना २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करुन ३० एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेशाला अपेक्षित गती न मिळाल्याने शिक्षण संचालकांनी आरटीई प्रवेशासाठी आता ८ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या बालकांना आरटीईत निवडीचे संदेश आले आहेत. त्यांनी पंचायत समितीस्तरावर कागदपत्रांची पडताळणी करुन संबधित शाळेत ८ मे पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

आतापर्यंत ६२ बालकांचे प्रवेश निश्चित...पुणे येथे ५ एप्रिल रोजी सोडत जाहीर झाली होती. त्यानंतर १२ एप्रिलपासुन पालकांना निवडीचे संदेश येत आहेत. मात्र, संदेश आल्यावरही अनेक पालकांनी अद्याप कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित केलेले नाहीत. जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत केवळ ६२ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले होते. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करुन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

सोडतीत १ हजार ६४८ बालकांची निवड...जिल्ह्यात आरटीईच्या १६६९ जागा आहेत. मात्र, पुणे येथे काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये १६४८ जागांवरच निवड करण्यात आली आहे. मध्यंतरी आरटीईचे पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या अडचणी आता दुर झाल्या आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट अर्ज आले असल्याने अनेक पालकांना सोडतीत निवड न झाल्याने इतर शाळेत बालकांचे प्रवेश निश्चित करावे लागत आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाlaturलातूर