शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नजर कमी झाल्याने बालकांच्या डोळ्यांत येऊ शकतो तिरळेपणा!

By हरी मोकाशे | Updated: August 25, 2023 18:23 IST

शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

लातूर : मुलांचे वय वाढू लागले की, त्यांच्यातील जन्मजात असलेले व्यंगही दिसू लागतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे धावाधाव सुरु होते. मात्र, पालकांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घेतल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. दरम्यान, जिल्ह्यात चार महिन्यांत अंगणवाडी व शाळांमध्ये केलेल्या आरोग्य तपासणीत ४५ बालकांत तिरळेपणा आढळून आला आहे. त्यातील २२ मुलांवर शस्त्रक्रिया करुनच तिरळेपणा दूर करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण ३० वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते.एप्रिल ते जुलैअखेर या कालावधीत जिल्ह्यातील २५८७ अंगणवाड्यातील १ लाख ६० हजार ४५६ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जुलैमध्ये ६८ हजार ९६८ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तिरळेपणाची लक्षणे असलेली ४५ मुले आढळून आली आहेत. ही तपासणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक अमोल झेंडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

४५ मुलांना तिरळेपणाची लक्षणे...राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ४२४ मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ४५ जणांमध्ये तिरळेपणाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात २२ मुलांमधील तिरळेपणा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आतापर्यंत ६ बालकांवर शस्त्रक्रिया...

अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २२ पैकी ६ बालकांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उर्वरित बालकांवर टप्प्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दरम्यान, ४५ पैकी २३ बालकांना चष्मा व औषधी देण्यात आली आहेत.

अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यास काळजी घ्या...तिरळेपणा हा जन्मजात असू शकतो. बालकांना शाळेत फलकावरील अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यासही होऊ शकतो. सततची डोकेदुखी, चष्मा लागूनही तो न वापरण्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. श्रीधर पाठक, नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय.

वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे...तिरळेपणा हा जन्मजात अथवा बाळांतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने निर्माण होऊ शकतो. शिवाय, नजर कमी झाल्याने किंवा चष्मा लागूनही तो न वापरल्याने होतो. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करु नये.

- डॉ. नंदकुमार डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Healthआरोग्यlaturलातूर