शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

नजर कमी झाल्याने बालकांच्या डोळ्यांत येऊ शकतो तिरळेपणा!

By हरी मोकाशे | Updated: August 25, 2023 18:23 IST

शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

लातूर : मुलांचे वय वाढू लागले की, त्यांच्यातील जन्मजात असलेले व्यंगही दिसू लागतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे धावाधाव सुरु होते. मात्र, पालकांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घेतल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. दरम्यान, जिल्ह्यात चार महिन्यांत अंगणवाडी व शाळांमध्ये केलेल्या आरोग्य तपासणीत ४५ बालकांत तिरळेपणा आढळून आला आहे. त्यातील २२ मुलांवर शस्त्रक्रिया करुनच तिरळेपणा दूर करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण ३० वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते.एप्रिल ते जुलैअखेर या कालावधीत जिल्ह्यातील २५८७ अंगणवाड्यातील १ लाख ६० हजार ४५६ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जुलैमध्ये ६८ हजार ९६८ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तिरळेपणाची लक्षणे असलेली ४५ मुले आढळून आली आहेत. ही तपासणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक अमोल झेंडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.

४५ मुलांना तिरळेपणाची लक्षणे...राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ४२४ मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ४५ जणांमध्ये तिरळेपणाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात २२ मुलांमधील तिरळेपणा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आतापर्यंत ६ बालकांवर शस्त्रक्रिया...

अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २२ पैकी ६ बालकांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उर्वरित बालकांवर टप्प्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दरम्यान, ४५ पैकी २३ बालकांना चष्मा व औषधी देण्यात आली आहेत.

अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यास काळजी घ्या...तिरळेपणा हा जन्मजात असू शकतो. बालकांना शाळेत फलकावरील अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यासही होऊ शकतो. सततची डोकेदुखी, चष्मा लागूनही तो न वापरण्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. श्रीधर पाठक, नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय.

वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे...तिरळेपणा हा जन्मजात अथवा बाळांतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने निर्माण होऊ शकतो. शिवाय, नजर कमी झाल्याने किंवा चष्मा लागूनही तो न वापरल्याने होतो. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करु नये.

- डॉ. नंदकुमार डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Healthआरोग्यlaturलातूर