शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

पावसामुळे पेरणीची लगबग, खत तुटवड्याने धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

तालुक्यातील शेतकरी खरिपासाठी हंगामपूर्व कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत होते. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने ...

तालुक्यातील शेतकरी खरिपासाठी हंगामपूर्व कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत होते. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान, मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यापासून कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून पेरणीची लगबग सुरू केली आहे. पेरणीवेळी शेतकरी डीएपी आणि १२:३२:१६ या खताचा वापर करतात. त्यामुळे या खताला सध्या सर्वाधिक मागणी आहे. परंतु, सदरील खत उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या खतासाठी देवणी शहरासह वलांडी, जवळगा अशा मोठ्या गावांतील शेतकरी कृषी सेवा केंद्रावर सातत्याने हेलपाटे मारत आहेत. परंतु, विक्रेत्यांकडून खत उपलब्धतेसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कधी उपलब्ध होईल, हेही विक्रेते निश्चितपणे सांगत नाहीत.

सध्या तालुक्यात दररोज पाऊस होत आहे. त्यामुळे पेरणीयोग्य स्थिती निर्माण झाली असून काही शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवातही केली आहे. परंतु, खत न मिळालेले शेतकरी संकटात सापडले आहेत. खताविना यंदा पेरा करावा लागणार की, काय अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे अधिकारी हतबल...

सदरील खताच्या टंचाईबाबत येथील प्रमुख विक्रेते एक- दोन दिवसांत खताची रॅक उपलब्ध होईल आणि पुढील आठवड्यात खत प्राप्त होईल, असे सांगत आहेत. दरम्यान, कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पसंतीचे डीएपी व अन्य ठरावीक खत सध्या उपलब्ध नाही. केव्हा उपलब्ध होईल, हेही सांगता येत नाही, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सोयाबीन बियाणेही महागले...

तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. यंदा सोयाबीन बियाणांच्या बॅगचा दर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उसनवारी करून बियाणे खरेदी करीत आहेत. परंतु, रासायनिक खत मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय, गतवर्षीच्या खरीप हंगामाचा पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.