शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे ग्राम कृषी विकास समित्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST

चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास ...

चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायतीत ग्राम कृषी विकास समितीची स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या समित्या स्थापन झाल्या नाहीत. परिणामी, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.

शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार व प्रसार आवश्यक आहे. विविध योजनांचा नियमित आढावा घेऊन त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रात विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन करणे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. समितीच्या कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत कार्य करण्याचा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

तसेच समितीमार्फत कृषी व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड, एकात्मिक पोषण यांचा प्रचार, नियमित शेती, फळबाग लागवडीचा आढावा घेणे, शेतीपूरक योजनांबद्दल मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. शासनाकडून अशा प्रकारची समिती स्थापन करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे चाकूर तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने आपल्या गावात ग्राम कृषी विकास समित्या स्थापनच झाल्या नाहीत.

समितीचे सरपंच अध्यक्ष...

सदरील समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच असून ग्रामसेवक सदस्य सचिव आहेत. उपसरपंच सदस्य असून प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादन कंपनी / शेतकरी गटाचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, कृषीपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक हे या समितीचे सहसचिव आहेत. या समितीची सभा प्रत्येक महिन्यातून एकदा घेणे बंधनकारक आहे.

कोरोनामुळे अडचणी...

चाकूर तालुक्यातील कुठल्याही गावांत या समिती स्थापना झाली नाही. समित्या स्थापन करण्यासंबंधी गटविकास अधिका-यांसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समित्या स्थापन करण्यासाठी विलंब झाला आहे. लवकरच समित्या गठीत करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार म्हणाले.

ग्रामसेवकांना आदेश...

सर्व ग्रामसेवकांना समिती स्थापन करण्याबाबत आदेश दिले आहेत. कोविडमुळे ग्रामसभा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समिती गठण करण्यासाठी अडचणी येत आहेत. ऑनलाइन ग्रामसभा घेण्याबाबत आदेश आले असून लवकरच समित्या गठीत होतील, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले.

योजनांचा लाभ मिळेना...

समिती गठीत नसल्याने शेतकऱ्यांना शासन योजनांची माहिती मिळत नाही. लवकरात लवकर समिती गठण करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केली.