शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पर्यावरणाच्या असमतोलामुळे पर्जन्यमानाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:19 IST

कमी होत चाललेला पाऊस चिंताजनक

- संदीप शिंदे

राज्यभरात सगळीकडे पावसाचे जोर कायम आहे़ मात्र मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे़ दिवसेंदिवस पर्जन्यमानाचे कमी होत जाणारे प्रमाण चिंताजनक आहे़ वृक्षसंवर्धन हा त्यावरील प्रमुख उपाय आहे़ त्यामुळे वृक्षचळवळीबरोबरच प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत भुगोल तज्ज्ञ सुरेश फुले यांनी व्यक्त केले़ त्यांच्याशी साधलेला संवाद़़़

पावसाचे प्रमाण कमी होण्याची प्रमुख कारणे कोणती? 

मानव आणि निसर्गनिर्मीत कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ मराठवाड्याचा नैसर्गिकरित्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात समावेश होतो़ वृक्षाचे कमी झालेले प्रमाण, शहरीकरण, औद्यागीकीकरणाचे वाढलेले क्षेत्र, कृषी क्षेत्रात घट होऊन वाढणारे वस्तीकरण या कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे हवेमध्ये आवश्यकतेपेक्षा प्रमाण जास्त असल्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ परिणामी ढग येते पण पाऊस पडत नाही़ अशी स्थिती जिल्ह्यात सध्या दिसत आहे़

पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे ?  कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे, हवेचे प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे़ लोकसंख्या वाढीमुळे सुख-सुविधा वाढत ्नचालल्या आहेत़ मात्र त्या पुरविण्यास निसर्ग असमर्थ होत चालला आहे़ निसर्गाचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे़ तरच पावसाचे प्रमाण वाढविण्यास मदत होऊ शकेल़

पावसाची सरासरी कशाप्रकारे ठरविली जाते? मागील पावसाच्या सरासरीवर पर्जन्यमान ठरविले जाते़ गेल्या २५ ते ३० वर्षांत काळानुरुप पावसात घट होत आहे़ मराठवाड्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ७० ते ८० टक्के पाऊस मिळतो तर ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे उर्वरीत पाऊस मिळतो़मराठवाड्यात वनाचे क्षेत्र अत्यल्प आहे़ ३३ वनक्षेत्राची आवश्यकता असताना लातूर जिल्ह्यात केवळ ०़०१ टक्के वनाचे क्षेत्र आहे़ त्यामुळे वनसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवड चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे़ इतर प्रदेशात वनक्षेत्र अधिक असल्याने पाऊसाचे प्रमाण समाधानकारक आहे़

वातावरणात सांद्रीभवन झाले तरच पाऊसशहराची वाढत चाललेली लोकसंख्या, वायुचे प्रदुषण, औद्योगिक प्रदुषण, कृषी क्षेत्रात होत असलेल्या घटीमुळे वातावरणात अनपेक्षीत बदल होत आहे़ कार्बन डायआॅक्साईड, कार्बन मोनाक्साईड या प्रदुषक तत्वाचे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाण असल्यास पाऊस पडण्यास प्रतिकुल परिस्थीती निर्माण होते़ वातावरणात सांद्रीकरण होणे गरजेचे आहे़ या प्रक्रीयेवरच पर्जन्यमान अवंलबुन असते़ सांद्रीकरण न झाल्यास पाऊसास विलंब होऊ शकतो़ असेही सुरेश फुले यांनी सांगितले़

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूरenvironmentपर्यावरण