शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

खरीप पेरणीपूर्वीच दरवाढीचा "डोस"; खतांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या ...

कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीचे अर्थचक्र बदलले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

...तर उत्पन्न वाढणार कसे

शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. मजूर मिळत नसल्याने पेरणी, नांगरणी यासारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे. मळणीसाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर उपयोगात आणले जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या कामांचे दरही वाढले आहेत. असे असतानाच खतांच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीचे मीटर असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खताचे नाव आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११७५ १४५०

१९-१९-१९ १२८५ १५००

१२-३२-१६ ११८५ १४६०

२४-२४ १२२० १३५०

डीएपी १२०० १५००

कोरोनाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी अडचणी आल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता इंधन दरवाढीबरोबर खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी. - शेतकरी

अनेक जण खरीप हंगामाच्या आधीच खते, बियाणे खरेदी करतात. सर्वसामान्य महागाईमुळे भरडला जात आहे. दोनशे ते अडीचशे रुपयांनी खताची दरवाढ झाली आहे. आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. - शेतकरी

रब्बी हंगाम संपत आला आहे. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी महिन्याआधीच खतांची खरेदी करून ठेवतात. यंदा दरवाढ असल्याने अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.

विनोदकुमार भुतडा, खतविक्रेते, अहमदपूर