शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

खरीप पेरणीपूर्वीच दरवाढीचा "डोस"; खतांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या ...

कोरोनाच्या संकट काळात शेती व्यवसायाने सर्वसामान्यांची गरज भागविली. लॉकडाऊन काळातही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, अतिवृष्टीसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठीचे अर्थचक्र बदलले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतानाच खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

...तर उत्पन्न वाढणार कसे

शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. मजूर मिळत नसल्याने पेरणी, नांगरणी यासारख्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे. मळणीसाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर उपयोगात आणले जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या कामांचे दरही वाढले आहेत. असे असतानाच खतांच्या दरात वाढ झाली आहे. दरवाढीचे मीटर असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खताचे नाव आधीचे दर आताचे दर

१०-२६-२६ ११७५ १४५०

१९-१९-१९ १२८५ १५००

१२-३२-१६ ११८५ १४६०

२४-२४ १२२० १३५०

डीएपी १२०० १५००

कोरोनाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी अडचणी आल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता इंधन दरवाढीबरोबर खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी. - शेतकरी

अनेक जण खरीप हंगामाच्या आधीच खते, बियाणे खरेदी करतात. सर्वसामान्य महागाईमुळे भरडला जात आहे. दोनशे ते अडीचशे रुपयांनी खताची दरवाढ झाली आहे. आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. - शेतकरी

रब्बी हंगाम संपत आला आहे. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी महिन्याआधीच खतांची खरेदी करून ठेवतात. यंदा दरवाढ असल्याने अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.

विनोदकुमार भुतडा, खतविक्रेते, अहमदपूर