शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

शेतकऱ्याची अडवणूक करू नका, व्यवहार सुरु करा; बाजार समितीने बजावल्या नोटिसा!

By हरी मोकाशे | Updated: July 11, 2024 19:54 IST

बाजार समितीची कार्यवाही : शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये

लातूर : शेतमाल खरेदीच्या पैशावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ११ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, व्यवहार पूर्ववत सुरु करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. परंतु, तिढा कायम राहिला. परिणामी, बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शेतीमालाचे व्यवहार पूर्ववत सुरु करावेत, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतमाल खरेदीच्या पैश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सध्या शेतमालाची आवक कमी असली तरी दररोज जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल होत होती. यंदा वेळेवर खरीपाच्या पेरण्या झाल्याने पीक चांगले उगवले आहे. मात्र, काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी औषधांची फवारणी, कोळपणी, खुरपणी अशी कामे करीत आहेत. त्यासाठी पैश्याची आवश्यकता असल्याने घरातील सोयाबीनसह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. परंतु, बाजार बंद असल्याने शेतमाल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

११ दिवसांपासून तिढा सुटेना...पणन कायद्यानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत आडत्यांना पैसे देणे अपेक्षित आहे. या कायद्याचे पालन करण्यात यावे, असे पत्र बाजार समितीने काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश दिले जाईल, असे सांगितले होते. त्यावरुनच तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, १ जुलैपासून शेतीमालाचा सौदा होत नाही. दरम्यान, बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कार्यवाही...बाजार समितीत आलेल्या शेतमालाचा व्यवहार होणे आवश्यक आहे. मात्र, १ जुलैपासून खरेदीदार सौद्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. बाजार सुरु करण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या. मात्र, त्यात तोडगा निघत नसल्याने अखेर गुरुवारपासून नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोटिसा प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत शेतमालाच्या लिलावात खरेदीदारांनी सहभाग न घेतल्यास परवाना निलंबित, रद्द करण्याचा बाजार समितीला अधिकार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

६०० खरेदीदार...बाजार समितीत जवळपास ६०० खरेदीदार आहेत. या सर्वांना नाेटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु आहे. सौद्यात सहभागी होण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.- सतीश भोसले, प्रभारी सचिव.

आडत्याविना शेतमाल खरेदीस आम्ही तयार...अजून माझ्यापर्यंत नोटीस आली नाही. वैयक्तिकरित्या नोटिसा दिल्या जात असल्याचे समजले. लातूर बाजार समितीने राज्यातील इतर बाजार समितींप्रमाणे शेतमालाची थेट विक्री करण्यास सुरुवात करावी. आडत्यांच्या मध्यस्थीविना शेतमाल व्यवहारास आम्ही तयार आहोत. शेतमालाची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.- पांडुरंग मुंदडा, अध्यक्ष, खरेदीदार असोसिएशन.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र