शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

By संदीप शिंदे | Updated: December 9, 2023 19:21 IST

जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल

जळकोट (जि. लातूर) : समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका, जातीयवाद बाजूला सारा, आरक्षणासाठी मराठ्यांनी जागे व्हावे, एकजूट फुटू देऊ नका. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न केल्यास सरकारला पुढील आंदोलन जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिला.

नांदेड-जळकोट सीमेवरील जांब-जळकोट येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा शनिवारी दुपारी ४ वाजता पार पडली, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी जांब चौक ते सभेच्या ठिकाणापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. तसेच जांब-जळकोट येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे शिवाजी मोरे, श्याम शिंदे, दिलीप मोरे, दिनेश मोरे, शिवशंकर लांडगे, मारुती जाधव, मुक्तेश्वर येवले, संदीप बिरादार, संतोष पवार, मारुती डावळे यांच्या हस्ते जरांगे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ३५ लाख मराठा बांधवांना आरक्षण मिळाले आहे. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये आरक्षणाच्या नोंदी कमी सापडल्या आहेत. संबधित अधिकाऱ्यांनी तातडीने नोंदी शोधाव्यात, अशा सूचना शासनास केल्या असल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबरला मराठा आरक्षण व ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत सरकारने शब्द दिला आहे. तसा त्यांनी कायदा पारित करावा, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे. जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

आरक्षणाशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही...मराठा आरक्षणासाठी आपण शांततेने लढा सुरू ठेवणार आहोत. गावे पिंजून काढा, मराठा समाजबांधवांनो, जागे व्हा! मला बळ द्या, आशीर्वाद द्या! मरण आले तरी आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी एक इंचही मागे सरकणार नाही, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी सभेत केले. यावेळी श्रीकांत सूर्यवंशी, व्यंकट मोरे, शिवाजी मोरे, श्याम शिंदे, दिनेश मोरे, संतोष पवार, संतोष पवार, सभापती विठ्ठल चव्हाण, ॲड. श्रीनिवास मनाले, दिगंबर भोसले, संजय माने आदींसह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaturलातूर