शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव ...

जळकोट तालुक्यातील सोयाबीनवर सद्य:स्थितीत करप्या, मावा, खोड अळी, शेंडी अळी, हळद्या, आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ५० टक्के घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तालुक्यात एकूण २५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य असून, त्यापैकी ८ ते १० हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी आपले नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पेरा केला आहे. मात्र, सारखा पाऊस व त्या पाठपोठ विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिके पूर्णतः धोक्यात आले आहेत. त्याचबरोबर मुगाचे पीक व उडिदाचे पिके १०० टक्के हातातून गेले आहे. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे होण्याच्या आधीच या रोगाने घाला घातल्याने बळिराजा अडचणीत आला आहे.

शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे, वीज बिलाची वसुली थांबवावी, बँकेची वसुली थांबवावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे, मोफत शिक्षण करण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील ४७ गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

रबी हंगामाकडे शेतकऱ्यांच्या आशा...

जळकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पावसामुळे तालुक्यातील लघू, मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे. खरिपाचे पीक हातचे गेले असून, रबी हंगामात तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.