शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

अहमदपूर : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घोळ झाला असून आरोग्य विभागाकडे १०२, तर महसूल प्रशासनाकडे २२३ जण कोरोनामुळे मृत्यू ...

अहमदपूर : तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घोळ झाला असून आरोग्य विभागाकडे १०२, तर महसूल प्रशासनाकडे २२३ जण कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दोन्ही शासकीय यंत्रणेकडील नोंदीत तफावत झाल्याने तालुक्यात कोरोनामुळे निश्चित मृत्यू किती झाले, असा सवाल निर्माण होत आहे.

अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल २०२० मध्ये आढळला होता, तर मे महिन्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाच्या पोर्टलवर एकूण १०२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यातही काही उणिवा असल्याने तसेच काही ठिकाणी पोर्टल अपडेट केले नसल्याने आणि खासगी दवाखान्यांनी यासंबंधीची संख्या सरकारी यंत्रणेला अद्यापपर्यंत दिली नसल्याने पोर्टलवरील मृत्यूची संख्या कमी दिसत आहे. कारण, जिल्ह्यात एकूण १ हजार ९६८ मृत्यू झाले असून पोर्टलला १ हजार ५२८ अशी नोंद आहे, तर हस्तलिखित ४४२ मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे गाेंधळ उडत आहे.

महसूलच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे ऑडिट करण्याविषयी पत्र आले असून त्यानुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण याद्यांनुसार अहमदपूर तालुक्यात आतापर्यंत २२३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही संख्या राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यात त्या व्यक्तीचा व्यवसाय, त्याचे वार्षिक उत्पन्न व कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतो याविषयी पूर्ण माहिती आहे.

बाधिताच्या मृत्यूनंतरच पोर्टलवर नोंद...

एखाद्या बाधिताचा राज्यात कुठेही मृत्यू झाला, तर त्याची नोंद अहमदपूरच्या पोर्टलवर आपोआप होत असते. मात्र, या पोर्टलवर काही रुग्णालयांनी नोंदणी न केल्याने ते अपडेट झाले नाही. त्यामुळे तफावत येऊ शकते, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा सर्व्हे..

शासनाच्या निर्देशानुसार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांमार्फत कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला. त्यात २२३ जणांची नाेंद झाली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हे...

प्रत्यक्ष सर्व्हे व पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार प्रत्यक्ष माहिती घेऊन प्रत्येक घरी भेट देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे या मृत्यूची संख्या देण्यात आली असल्याचे तलाठी माधव जोशी यांनी सांगितले.