शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
5
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
6
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
7
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
8
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
9
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
10
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
11
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
12
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
13
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
14
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
15
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
16
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
17
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
18
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
19
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
20
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

मधुमेह, धुम्रपान, कमी वजन; लातूर जिल्ह्यातील सव्वातीन लाख व्यक्ती क्षयरोगाच्या अतिजाेखमीत!

By हरी मोकाशे | Updated: August 6, 2024 12:46 IST

लातूर जिल्ह्यात गृहभेटीतून १६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

लातूर : मधुमेह, धुम्रपान, कमी वजन अशा कारणांमुळे जिल्ह्यातील १८ वर्षांपुढील ३ लाख २८ हजार ५०६ व्यक्ती क्षयरोगाच्या अति जोखमीच्या कक्षेत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे अतिजोखमीतील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी सर्वस्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांना मोफत गोळ्या- औषधी देण्यात येतात. तसेच पोषक आहारासाठी शासनाकडून आर्थिक मदतही दिली जाते. शिवाय, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने निक्षय मित्र बनवून अन्नदाता उपक्रम राबविला आहे. दरम्यान, क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सहा निकषानुसार जिल्ह्यात नुकतेच १८ वर्षांपुढील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात १५ लाख ६६ हजार ९८८ व्यक्तींची माहिती घेण्यात आली असता ३ लाख २८ हजार ५०६ जण अतिजोखीम गटात आढळले आहेत.

लातुरात सर्वाधिक जोखीमग्रस्त व्यक्ती...अहमदपूर - २८६९७औसा - ४४८४७चाकूर - २५२६०देवणी - १६०९९जळकोट - १२९०६निलंगा - ३९२४२रेणापूर - १९५८१शिरुर अनं. - १७०७४उदगीर - ३५७६९लातूर - ८९०३१

सहा निकषांअधारे जिल्ह्यात सर्वेक्षण...मागील पाच वर्षांत टीबी झाला होता का, मागील तीन वर्षांत टीबी रुग्णाच्या सहवासात असलेल्या व्यक्ती, मधुमेह, धुम्रपान, वजन कमी असलेली व्यक्ती आणाि ६० वर्षांपुढील व्यक्ती अशा सहा निकषांच्या आधारे गृहभेटीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

क्षयरोगाचे सध्या जिल्ह्यात १६०३ रुग्ण...सध्या जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ६०३ रुग्ण आहेत. त्यांना शासनाच्या वतीने मोफत गोळ्या- औषधी देण्यात येत आहेत. तसेच सकस आहारासाठी शासनाकडून रक्कमही दिली जात आहे. त्याचबरोबर निक्षय मित्रांच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

क्षयरोगाचा संसर्ग थुंकी, खोकल्यातून...क्षयरोगाचा संसर्ग हा थुंकी, खोकल्यामुळे हवेतून होतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, काखेत अथवा मानेभोवती गाठ येणे अशी क्षयरोगाची लक्षणे आहेत. क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची लवकरात लवकर तपासणी करुन उपचार करणे महत्त्वाचे ठरते.

जिल्ह्यात लवकरच लसीकरण मोहीम...अतिजोखमीतील व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना मोफत बीसीजी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या दाेन वर्षांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे आढळून येईल.- डॉ. एस.एन. तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य