शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी धरणे

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2022 17:21 IST

रेणापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन

रेणापूर : शासकीय गायरान जमिनीवर अनुसुचित जाती, जमातीच्या नागरिकांनी उपजिविकेसाठी अतिक्रमण केेले आहे. ते नियामानुकुल करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जमीन अधिकार आंदोलन व वंचित हक्क आंदोलनच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी एक दिवसीय धरणे सत्याग्रह करण्यात आला.

तालुक्यातील काही ठिकाणच्या शासकीय गायरान पडिक जमिनी निजामकाळापासून वहितीखाली आणून त्यावर काही कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे गायरान पट्टे नियमाकुल करण्याऐवजी राज्य सरकार ही जमीन काढून घेण्यासाठी नोटिसा बजावत आहे. तर दुसरीकडे धनदांडग्या उद्योगपतींना हजारो एकर जमिनी उद्योगांच्या नावावर देत आहेत. ज्यांच्याकडे उपजिविकेसाठी कुठलेही शाश्वत साधन नाही, अशांच्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न सुुरु आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करावीत. नियमाकुल करण्याचा कायदा करावा. शासकीय जमिनीवरील गरिबांची घरे त्यांच्या नावे करावीत. घरकुलासाठी शासकीय जागा द्यावी. संगांयो, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक ३ हजार रुपये द्यावे. त्यासाठीची २१ हजारांच्या उत्पन्नाची अट रद्द करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

हे आंदोलन जमीन अधिकार आंदोलन व वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्रचे नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनात वंचित हक्क आंदोलनाचे प्रदेश सचिव सुनील क्षीरसागर, मारुती गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या सत्याग्रहात किशोर कसबे, डिगांबर चव्हाण, अंकुश चिकटे, संजय गायकवाड, मुरलीधर सावंत, रतन गायकवाड, मोहन वायदंडे, वाल्मिक घोडके, सतीश शिंदे, गौतम आचार्य, रमेश तिगोटे, महानंदा टेकाळे, सुमनबाई घोडके, सिमिंता वायदंडे, चंद्रकला आचार्य, दैवशाला घोडके आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूर