शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जळकोट-कंधार बससेवा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

बसफेऱ्या लॉकडाऊनपासून बंद आहेत. इतर बससेवा पूर्ववत झाल्या असल्या तरी ही बसेसेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. परिणामी, ...

बसफेऱ्या लॉकडाऊनपासून बंद आहेत. इतर बससेवा पूर्ववत झाल्या असल्या तरी ही बसेसेवा अद्याप सुरू करण्यात आली नाही. परिणामी, या मार्गावरील नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी कंधार - जळकोट मार्गे वांजरवाडा बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उदगीर आणि कंधार आगाराच्या कंधार-वांजरवाडा-जळकोट या बस लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. अद्यापही त्या बंदच आहेत. गत अनेक महिन्यांपासून बस बंद असल्याने त्या सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची निराशा होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी प्रवास सुरू झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, व्यापारी, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, दिव्यांग व्यक्ती या सर्वांनाच या बसअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी ८.३० अथवा ९ वाजता जळकोटला जाणारी आणि सायंकाळी ५ वाजता जळकोटहून वांजरवाडा - होकर्णा मार्गे परत कंधारला जाणारी बससेवा सुरू केल्यास विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे.

या मार्गावर तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे लक्ष्मण तगडमपले, होकर्णा येथील सरपंच नागीनबाई भुरे, उपसरपंच गोदावरी दिगांबर पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, भानुदास राऊतराव, कृष्णराज भुरे, बापूस दिवानजी, उतम देवकत्ते, जिलानी ‌शेख, रामेश्वर पाटील, निखिल शेकापुरे, माधव बोडके यांच्यासह प्रवाशांनी केली आहे.