शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटातील न्यायालय सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, येथे अद्यापही तालुका न्यायालय स्थापन झाले नाही. ...

जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, येथे अद्यापही तालुका न्यायालय स्थापन झाले नाही. त्यामुळे येथे तालुका न्यायालय सुरू करण्यात यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

लातूर जिल्ह्याच्या सीमेवर जळकोट तालुका आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तालुका निर्मिती होऊन २२ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, येथे अद्यापही तालुका न्यायालय निर्माण करण्यात आले नाही. जिल्ह्यातील इतर नवीन तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय स्थापन झाले आहेत. परंतु, येथे न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

जळकोटात तालुका न्यायालय निर्माण करण्यात यावे, अशी नागरिकांची सततची मागणी आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे पाटील व अन्य मंडळींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घातले होते. तेव्हा हालचाली सुुरू झाल्या आणि येथे तालुका न्यायालय मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु, अद्यापही येथे तालुका न्यायालय सुरू झाले नाही.

नागरिकांची अडचण दूर करावी...

जळकोटातील तालुका न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या इमारतीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या इमारतींची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यातील एक इमारत निश्चित करण्यात आली. त्यामुळे तालुका न्यायालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. येथे न्यायालय नसल्याने अन्य तालुक्याच्या ठिकाणी खटले दाखल असलेल्यांना सतत हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी येथील तालुका न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.