शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जुन्या जीर्ण इमारतींपासून धोका, मनपाने दिल्या १३० जणांना नोटिसा; तीन ठिकाणी सील

By आशपाक पठाण | Updated: July 23, 2023 19:52 IST

यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

 

लातूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गावभागासह प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात अनेक जीर्ण इमारती आहेत. पावसामुळे अनेकांच्या भिंतीत पाणी मुरत असल्याने धोका निर्माण झाला आहे. यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

लातूर शहरातील गाव भागात व बाजारपेठेत अनेक जुन्या व शंभर वर्षापुर्वीच्या ईमारती आहेत. त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या ईमारती दगडी बांधकामाच्या असून त्यांचा काही भाग हा कोसळलेलाही आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात अशा जीर्ण झालेल्या ईमारतींना अधिक धोका असतो. पावसाचे पाणी मुरल्याने अशा जीर्ण ईमारती पडून त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. गावभाग, गंजगोलाई परिसरात असलेल्या अशा जीर्ण व धोकादायक ईमारतीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या ईमारतीबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळीच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे. दोन दिवसात तीन ठिकाणी सील केले आहे.

गावभागात २२ धोकादायक इमारती...

गावभागातील आझाद चौक, मिस्कीनपुरा, पटेल चौक, माळी गल्ली, तेली गल्ली, राम गल्ली, देशपांडे गल्ली आदी भागात २२ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. तसेच पडके जुने घर, भिजलेली भिंत, सामायिक भिंतीला तडे असे दिसून आल्याने जवळपास ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. शनिवारी एका ठिकाणी सील करण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले.

गंजगोलाईत दोन ठिकाणी कारवाई...मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई भागात, बाजारपेठेत धोकादायक आढळून आलेल्या ४५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा गंजगोलाईतील दोन ठिकाणी तात्काळ सील करण्यात आले आहे. तसेच शेजारच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, जुन्या घरातील लोकांनी पावसाळ्यात किमान चार महिने इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे कळविण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे यांनी सांगितले.

जीर्ण इमारतीचा शेजाऱ्यांना धोका...गंजगोलाईत बाजारपेठेत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत. अनेकांचे बांधकाम १०० वर्षापूर्वीचे आहे. ज्यांच्यामुळे शेजाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी स्थिती आहे, अशा ठिकाणी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. भिज पाऊस सतत राहिल्यास भिंतीत पाणी मुरून धोका वाढू शकतो, अशी भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसEnchroachmentअतिक्रमण