शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जुन्या जीर्ण इमारतींपासून धोका, मनपाने दिल्या १३० जणांना नोटिसा; तीन ठिकाणी सील

By आशपाक पठाण | Updated: July 23, 2023 19:52 IST

यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

 

लातूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गावभागासह प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात अनेक जीर्ण इमारती आहेत. पावसामुळे अनेकांच्या भिंतीत पाणी मुरत असल्याने धोका निर्माण झाला आहे. यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.

लातूर शहरातील गाव भागात व बाजारपेठेत अनेक जुन्या व शंभर वर्षापुर्वीच्या ईमारती आहेत. त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या ईमारती दगडी बांधकामाच्या असून त्यांचा काही भाग हा कोसळलेलाही आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात अशा जीर्ण झालेल्या ईमारतींना अधिक धोका असतो. पावसाचे पाणी मुरल्याने अशा जीर्ण ईमारती पडून त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. गावभाग, गंजगोलाई परिसरात असलेल्या अशा जीर्ण व धोकादायक ईमारतीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या ईमारतीबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळीच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे. दोन दिवसात तीन ठिकाणी सील केले आहे.

गावभागात २२ धोकादायक इमारती...

गावभागातील आझाद चौक, मिस्कीनपुरा, पटेल चौक, माळी गल्ली, तेली गल्ली, राम गल्ली, देशपांडे गल्ली आदी भागात २२ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. तसेच पडके जुने घर, भिजलेली भिंत, सामायिक भिंतीला तडे असे दिसून आल्याने जवळपास ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. शनिवारी एका ठिकाणी सील करण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले.

गंजगोलाईत दोन ठिकाणी कारवाई...मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई भागात, बाजारपेठेत धोकादायक आढळून आलेल्या ४५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा गंजगोलाईतील दोन ठिकाणी तात्काळ सील करण्यात आले आहे. तसेच शेजारच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, जुन्या घरातील लोकांनी पावसाळ्यात किमान चार महिने इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे कळविण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे यांनी सांगितले.

जीर्ण इमारतीचा शेजाऱ्यांना धोका...गंजगोलाईत बाजारपेठेत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत. अनेकांचे बांधकाम १०० वर्षापूर्वीचे आहे. ज्यांच्यामुळे शेजाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी स्थिती आहे, अशा ठिकाणी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. भिज पाऊस सतत राहिल्यास भिंतीत पाणी मुरून धोका वाढू शकतो, अशी भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसEnchroachmentअतिक्रमण