शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा जळकोट तालुक्यास बसला. यात लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ...

शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा जळकोट तालुक्यास बसला. यात लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शहरासह मरसांगवी, शिवाजीनगर तांडा, रावणकोळा, भवानीनगर तांडा, सुल्लाळी, डोंगरगाव, हळद वाढवणा, पाटोदा खु., वांजरवाडा, धामणगाव, केकत शिंदगी या गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसून नुकसान झाले आहे. केशर आंब्याच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

शिवाजीनगर तांडा, हतनूर, गव्हाण, पाटोदा बु., जळकोट येथील केशर आंब्यास सर्वाधिक फटका बसला आहे. गावरान आंब्याच्या कैऱ्या गळाल्या आहेत. उन्हाळी भुईमूग आणि हळदीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. तत्काळ पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, विकास सोमवंशी, मुक्तेश्वर येवले, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, सरपंच तानाजी राठोड, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, प्रशांत देवशेट्टे, साहेबराव पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, गोविंद केंद्रे, आदींनी केली आहे.

पंचनामे करण्याचे आदेश...

प्रशासनाला तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येईल, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक गावात तलाठ्यास पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येतील.

वीज कोसळून जनावरे दगावली...

हतनूर येथील कोंडिबा जाधव यांच्या बैलावर वीज कोसळल्याने बैल जागीच दगावला. बोरसांगवी येथील रामदास दत्ता कोरे यांच्या म्हैशीवर वीज कोसळल्याने ती दगावली. पाटोदा खु. येथे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे नुकसान झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.