शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरिकांची बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST

अहमदपूर : विकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबडच उडाली होती. काही जणांच्या ...

अहमदपूर : विकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबडच उडाली होती. काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. शिवाय, फिजिकल डिस्टन्सही राखला जात नव्हता. शासन नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत असला तरी सोमवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी दिसून येत होती. भाजीपाला, किराणा साहित्याचा बहाणा करुन काहीजण घराबाहेर पडल्याचे आढळून आले.

शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नागरिक, व्यापाऱ्यांकडूनही शासन नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळाले. काही जणांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसून येत नव्हता. तसेच भाजीपाला, फळविक्रेतेही विनामास्क विक्री करीत होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली असता विविध कारणे सांगण्यात येत होते. त्यामुळे पथकातील कर्मचारीही हतबल होत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येत नाही, अशांवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

गत आठवड्यात प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पायबंद बसला होता. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांना दंड...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी नगरपालिकेने पथक नियुक्त केले आहे. हे पथक शहरात सकाळपासून पोलीस प्रशासनाच्या मदतीने

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

आझाद चौकात पुन्हा कोंडी...

शहरातील आझाद चौकातून भाजी मार्केट, जुने शहर आणि अन्य ठिकाणी रस्ते जातात. या चौकात भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. शहरातील अन्य चौकात मात्र कामानिमित्ताने काही नागरिक असल्याचे पहावयास मिळाले. येथील आझाद चौकात दररोज पथक नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.