शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के आगाऊ रक्कम

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2023 20:23 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : महिनाभरापासून पावसाच्या खंडामुळे नुकसान

लातूर : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश शुक्रवारी पीकविमा कंपनीस दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला असून तो ९८ टक्के आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर ८८ हजार ७४६ हेक्टरवर तूर, उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, मका, कापूस व अन्य पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४०.६ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, जुलै अखेरपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, खरीपातील पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली आहे.

दरम्यान, पावसाने खंड दिल्यामुळे विविध संघटनांसह, पक्षांच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासह २५ टक्के आगाऊ पीकविमा देण्याची मागणी केली होती. तसेच लाेकमतमधून सविस्तर वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचे सर्वेक्षण कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक शेतकऱ्यांनी केले. त्यात अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सोयाबीन या पिकास संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम पीकविमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांना दिले आहेत.

२५ टक्के भरपाई मिळणारी महसूल मंडळे...

जिल्ह्यातील ६० पैकी ६० महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आहे. त्यात गातेगाव, कासारखेडा, लातूर, मुरुड, तांदुळजा, बाभळगाव, हरंगुळ बु., चिंचोली बु., कन्हेरी, औसा, भादा, किल्लारी, लामजना, मातोळा, किणी थोट, बेलकुंड, उजनी, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, शिरुर ताजबंद, हडोळती, अंधोरी, अंबुलगा बु., औराद शहाजानी, कासार बालकुंदा, कासारशिरसी, निलंगा, मदनसुरी, पानचिंचोली, निटूर, भुतमुगळी, हलगरा, मोघा, हेर, उदगीर, वाढवणा बु., देवर्जन, नागलगाव, नळगीर, तोंडार, कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर, पानगाव, पळशी, चाकूर, वडवळ नागनाथ, नळेगाव, शेळगाव, झरी बु., आष्टा, शिरुर अनंतपाळ, हिसामाबाद, साकोळ, जळकोट, घोणसी, वलांडी, देवणी, बोरोळ या ६० मंडळातील सोयाबीन उत्पादकांना आग्रीम मिळणार आहे.

महिनाभरात भरपाई देण्याचे आदेश...जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून पावसाच्या खंडामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिकची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीस सोयाबीन उत्पादकांना २५ टक्के आग्रीम द्यावी. ही आग्रीम महिनाभरात पीकविमा धारकांच्या खात्यावर जमा करावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

- शिवसांब लाडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :laturलातूरRainपाऊस