शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के आगाऊ रक्कम

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2023 20:23 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : महिनाभरापासून पावसाच्या खंडामुळे नुकसान

लातूर : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश शुक्रवारी पीकविमा कंपनीस दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला असून तो ९८ टक्के आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर ८८ हजार ७४६ हेक्टरवर तूर, उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, मका, कापूस व अन्य पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४०.६ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, जुलै अखेरपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, खरीपातील पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाली आहे.

दरम्यान, पावसाने खंड दिल्यामुळे विविध संघटनांसह, पक्षांच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासह २५ टक्के आगाऊ पीकविमा देण्याची मागणी केली होती. तसेच लाेकमतमधून सविस्तर वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हास्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचे सर्वेक्षण कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक शेतकऱ्यांनी केले. त्यात अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सोयाबीन या पिकास संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम पीकविमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे यांना दिले आहेत.

२५ टक्के भरपाई मिळणारी महसूल मंडळे...

जिल्ह्यातील ६० पैकी ६० महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आहे. त्यात गातेगाव, कासारखेडा, लातूर, मुरुड, तांदुळजा, बाभळगाव, हरंगुळ बु., चिंचोली बु., कन्हेरी, औसा, भादा, किल्लारी, लामजना, मातोळा, किणी थोट, बेलकुंड, उजनी, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, शिरुर ताजबंद, हडोळती, अंधोरी, अंबुलगा बु., औराद शहाजानी, कासार बालकुंदा, कासारशिरसी, निलंगा, मदनसुरी, पानचिंचोली, निटूर, भुतमुगळी, हलगरा, मोघा, हेर, उदगीर, वाढवणा बु., देवर्जन, नागलगाव, नळगीर, तोंडार, कारेपूर, पोहरेगाव, रेणापूर, पानगाव, पळशी, चाकूर, वडवळ नागनाथ, नळेगाव, शेळगाव, झरी बु., आष्टा, शिरुर अनंतपाळ, हिसामाबाद, साकोळ, जळकोट, घोणसी, वलांडी, देवणी, बोरोळ या ६० मंडळातील सोयाबीन उत्पादकांना आग्रीम मिळणार आहे.

महिनाभरात भरपाई देण्याचे आदेश...जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून पावसाच्या खंडामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिकची उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीस सोयाबीन उत्पादकांना २५ टक्के आग्रीम द्यावी. ही आग्रीम महिनाभरात पीकविमा धारकांच्या खात्यावर जमा करावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

- शिवसांब लाडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :laturलातूरRainपाऊस