शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत वीजपुरवठ्यामुळे तेरा गावात पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती ...

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढावली आहे. पाणीप्रश्न अतिशय गंभीर बनला असून, सतरा खेडी पाणी पुरवठा योजना अस्तित्वात असूनही तळ्यात पाण्याचा साठा असतानाही प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अडीच महिन्यापासून विजपुरवठा खंडीत असल्याने लोकांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.

धामणगाव नजिकच्या तळ्यावरून ही सतराखेडी पाणी पुरवठा योजना आहे. त्यातून चार गावाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेवर आता तेरा गावे अवलंबून आहेत. त्यात आटोळा, कबनसांगवी, अजनसोंडा खू., आंबेवाडी, कुंभेवाडी, नागेशवाडी, तिवघाळ, उजळंब, सावरगाव, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी या गावांचा समावेश आहे. धामणगाव तळ्यात पाणीसाठा भरपूर आहे. जानेवारी महिन्याच्या अखेर वीज देयक बिल थकले म्हणून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जवळपास अडीच महिन्यापासून या योजनेचे पाणी पुरवठा बंद आहे. त्याची झळ तेरा गावातील ग्रामस्थांवर बसत आहे. कोरोनाच्या या स्थितीत अबालवृद्ध पुरुष, महिला, मुले पिण्याच्या पाण्यासाठी शिवारात भटकंती करत आहेत. मे महिना सुरु झाला. गावासह शिवारातील पाण्याचे स्त्रोत असलेले विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी झाला आहे. गावानजिक पाणी उपलब्ध नाही. वाहनातून ५०० लिटर्स पाणी २०० रुपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. तर या तेरा गावापैकी बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत नाहीत. वीजपुरवठा खंडीत केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा जोडणी करावी. यासाठी सरपंचानी पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे जाऊन तक्रारी केल्या आहेत. वीजपुरवठा सुरु करण्यासाठी संबंधीत विभागाला सुचनाही दिल्या असून आदेशाला वीज विभागाने दाद दिली नाही. योजनेच्या विजेचे चालू बिल ३० लाख आहे. अखेर सरपंच मंडळीनी साडेचार लाख रुपये जमा करुन पंचायत समितीकडे दिले आहेत. पंचायत समितीनेही रक्कम जिल्हा परिषदला वर्ग केली आहे. मात्र, वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर जळालेले असून नवीन बसविण्याची गरज आहे. तळ्यातून पाण्याचा उपसा करणारी विद्यूत मोटारही जळालेली आहे. ती दुरुस्त करणे क्रमप्राप्त आहे. या उन्हापासून व कोरोनापासून बचाव करण्यासाठी वीज जोडणी करुन वीज पुरवठा अखंडपणे सुरू करणे अत्यावश्यक आहे. तरच या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल हे निश्चित आहे.

तात्काळ वीजजोडणी करावी...

सतराखेडी योजनेचा वीजपुरवठा जोडणी करावी. या योजनेचे पाणी सुरु झाले तर तेरा गावातील ग्रामस्थांची तहान भागणार आहे. अन्यथा या सर्व गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा. त्यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण प्रक्रिया करावी. आणि टँकर्सद्वारे तरी पाणीपुरवठा सुरु करुन जनतेची तहान भागवावी. - वसुंधरा मुंडे, सरपंच, लातूररोड

विकतच्या पाण्यावर तहान..

या तेरा गावात पाण्याचे गावाजवळ स्त्रोत नाही. सध्या विजेअभावी पाणी पुरवठा योजना बंद आहे. वाहनातून पाणी आणून त्याची विक्री केली जात आहे. प्रशासनाने वीज जोडणी करुन ही योजना तात्काळ सुरु करावी. आणि जनतेला पाणीपुरवठा करावा. - रेणुका तोडकरी, सरपंच, आटोळा

पाणीप्रश्न गंभीर आहे. त्यात उन्ह आणि कोरोना यामुळे लोकांना झळ बसत आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालून या योजने वरील वीजपुरवठा जोडणीसाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. - आमदार बाबासाहेब पाटील

वीजेची थकबाकी आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. साडेचार लाख रुपये जमा झाले आहेत. ते वीज मंडळाला भरून वीज जोडणीसाठी विनंती करणार आहे. - डी.ई. आष्टके उपविभागीय अभियंता, जि.प. लातूर