शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

खंडीत वीजपुरवठ्यामुळे तेरा गावात पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती ...

चाकूर : एकीकडे उन्हाची रखरख त्यातच दुसरीकडे कोरोनाचा कहर. अशा स्थितीत चाकूर तालुक्यातील तेरा गावातील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढावली आहे. पाणीप्रश्न अतिशय गंभीर बनला असून, सतरा खेडी पाणी पुरवठा योजना अस्तित्वात असूनही तळ्यात पाण्याचा साठा असतानाही प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अडीच महिन्यापासून विजपुरवठा खंडीत असल्याने लोकांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.

धामणगाव नजिकच्या तळ्यावरून ही सतराखेडी पाणी पुरवठा योजना आहे. त्यातून चार गावाने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेवर आता तेरा गावे अवलंबून आहेत. त्यात आटोळा, कबनसांगवी, अजनसोंडा खू., आंबेवाडी, कुंभेवाडी, नागेशवाडी, तिवघाळ, उजळंब, सावरगाव, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी या गावांचा समावेश आहे. धामणगाव तळ्यात पाणीसाठा भरपूर आहे. जानेवारी महिन्याच्या अखेर वीज देयक बिल थकले म्हणून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जवळपास अडीच महिन्यापासून या योजनेचे पाणी पुरवठा बंद आहे. त्याची झळ तेरा गावातील ग्रामस्थांवर बसत आहे. कोरोनाच्या या स्थितीत अबालवृद्ध पुरुष, महिला, मुले पिण्याच्या पाण्यासाठी शिवारात भटकंती करत आहेत. मे महिना सुरु झाला. गावासह शिवारातील पाण्याचे स्त्रोत असलेले विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी झाला आहे. गावानजिक पाणी उपलब्ध नाही. वाहनातून ५०० लिटर्स पाणी २०० रुपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. तर या तेरा गावापैकी बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत नाहीत. वीजपुरवठा खंडीत केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा जोडणी करावी. यासाठी सरपंचानी पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे जाऊन तक्रारी केल्या आहेत. वीजपुरवठा सुरु करण्यासाठी संबंधीत विभागाला सुचनाही दिल्या असून आदेशाला वीज विभागाने दाद दिली नाही. योजनेच्या विजेचे चालू बिल ३० लाख आहे. अखेर सरपंच मंडळीनी साडेचार लाख रुपये जमा करुन पंचायत समितीकडे दिले आहेत. पंचायत समितीनेही रक्कम जिल्हा परिषदला वर्ग केली आहे. मात्र, वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर जळालेले असून नवीन बसविण्याची गरज आहे. तळ्यातून पाण्याचा उपसा करणारी विद्यूत मोटारही जळालेली आहे. ती दुरुस्त करणे क्रमप्राप्त आहे. या उन्हापासून व कोरोनापासून बचाव करण्यासाठी वीज जोडणी करुन वीज पुरवठा अखंडपणे सुरू करणे अत्यावश्यक आहे. तरच या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल हे निश्चित आहे.

तात्काळ वीजजोडणी करावी...

सतराखेडी योजनेचा वीजपुरवठा जोडणी करावी. या योजनेचे पाणी सुरु झाले तर तेरा गावातील ग्रामस्थांची तहान भागणार आहे. अन्यथा या सर्व गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा. त्यासाठी विहीर, बोअर अधिग्रहण प्रक्रिया करावी. आणि टँकर्सद्वारे तरी पाणीपुरवठा सुरु करुन जनतेची तहान भागवावी. - वसुंधरा मुंडे, सरपंच, लातूररोड

विकतच्या पाण्यावर तहान..

या तेरा गावात पाण्याचे गावाजवळ स्त्रोत नाही. सध्या विजेअभावी पाणी पुरवठा योजना बंद आहे. वाहनातून पाणी आणून त्याची विक्री केली जात आहे. प्रशासनाने वीज जोडणी करुन ही योजना तात्काळ सुरु करावी. आणि जनतेला पाणीपुरवठा करावा. - रेणुका तोडकरी, सरपंच, आटोळा

पाणीप्रश्न गंभीर आहे. त्यात उन्ह आणि कोरोना यामुळे लोकांना झळ बसत आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालून या योजने वरील वीजपुरवठा जोडणीसाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. - आमदार बाबासाहेब पाटील

वीजेची थकबाकी आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. साडेचार लाख रुपये जमा झाले आहेत. ते वीज मंडळाला भरून वीज जोडणीसाठी विनंती करणार आहे. - डी.ई. आष्टके उपविभागीय अभियंता, जि.प. लातूर