शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लातूर ते जहीराबाद महामार्गावर भेंगा पडल्या; ताजपूर-मुगाव येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: June 25, 2024 19:26 IST

४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या.

निलंगा : लातूर ते जहीराबाद हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, पानचिंचोली ते औराद शहाजनी मार्गावर भेगा व खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ताजपूर-मुगाव येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या. मार्गावर भेगा, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळंके यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. पानचिंचोली ते मुगाव भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील पृष्ठभागही खराब झाल्याने खड्डे पडले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारा असल्यामुळे महाराष्ट्राच्या हद्दीतून हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. मसलगा येथील पुलाच्या बाजूचा रस्ता खराब झाला आहे. शिवाय औराद शहाजानी येथील पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून रखडले असल्याने येथे अनेक अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

निष्कृष्ट कामाची चौकशी करावी...या रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय सोळूंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शहराध्यक्ष अजित नायकवाडे, सर्कलप्रमुख गंगाधर चव्हाण यासह कार्यकर्त्यांनी केली. शिवाय ताजपूर येथे महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

टॅग्स :laturलातूरcongressकाँग्रेसagitationआंदोलन