शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

By संदीप शिंदे | Updated: September 7, 2024 20:35 IST

दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण

निलंगा : तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी सहा गेट १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे उडत असून, आठ दिवसांपूर्वी तलाव १०० टक्के भरून धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतकऱ्याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला. ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची लांब भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसांखाली आली होती. त्यादिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तिच भेग शुक्रवारी चार इंचावरून दहा इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेल्या शेतकरी साळुके यांनी याच ठिकाणी उभारून व्हिडीओ करत चार दिवसांत एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरील वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

४० ते ५० टक्क्यांपर्यंत विसर्ग करण्याचे आदेश...मसलगा मध्यम प्रकल्पातून येत्या काही दिवसांत ४० ते सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात सोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे जोजारे यांनी सांगितले, तर अमरसिंह पाटील यांना विचारले असता गतवर्षी तलावात पाणी उपलब्ध नसल्याने आणि यंदा जोरदार पाऊस होऊन एकदम पाणीसाठा १०० टक्के भरल्याने असा प्रकार घडला असावा किंवा इतर कोणते कारण असावे याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले आहे. खबरदारी म्हणून ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा करणार...मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल, अशीही तीव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखविली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीDamधरण