शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर दीडशे फुटाची भेग; सहा दरवाज्यांतून विसर्ग, नागरिकांत भीती

By संदीप शिंदे | Updated: September 7, 2024 20:35 IST

दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण

निलंगा : तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल, या भीतीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी सहा गेट १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे उडत असून, आठ दिवसांपूर्वी तलाव १०० टक्के भरून धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतकऱ्याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला. ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दीडशे फुटाची लांब भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास चार दिवसांखाली आली होती. त्यादिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तिच भेग शुक्रवारी चार इंचावरून दहा इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेल्या शेतकरी साळुके यांनी याच ठिकाणी उभारून व्हिडीओ करत चार दिवसांत एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरील वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

४० ते ५० टक्क्यांपर्यंत विसर्ग करण्याचे आदेश...मसलगा मध्यम प्रकल्पातून येत्या काही दिवसांत ४० ते सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात सोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे जोजारे यांनी सांगितले, तर अमरसिंह पाटील यांना विचारले असता गतवर्षी तलावात पाणी उपलब्ध नसल्याने आणि यंदा जोरदार पाऊस होऊन एकदम पाणीसाठा १०० टक्के भरल्याने असा प्रकार घडला असावा किंवा इतर कोणते कारण असावे याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमला पाचारण केले आहे. खबरदारी म्हणून ३० टक्के पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा करणार...मुळात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने असा प्रकार घडत आहे. येथील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रोजंदारीवरील कामगार देखरेख करत आहेत. अनेक गावांची तहान भागवणारा एवढा मोठा प्रकल्पाची काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गतवर्षी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. आता पाणी सोडून दिल्यानंतर उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येईल, अशीही तीव्र भावना येथील नागरिकांनी बोलून दाखविली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीDamधरण