शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आयुष्यासाठी दारात गाय, कडुलिंब, तुळस आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

आजच्या काळात आयुर्वेदिक वनस्पतींकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नवनवीन रोगांच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खेड्यातील आयुर्वेदिक वनस्पतींचा ...

आजच्या काळात आयुर्वेदिक वनस्पतींकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नवनवीन रोगांच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खेड्यातील आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यास नवीन उद्भवणारे रोग होणार नाहीत. देवर्जन परिसरात असलेल्या हत्तीबेटाच्या डोंगरावरील आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन व्हावे, असेही राधाबाई पोतदार म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, आजच्या काळात प्रचंड वृक्षतोड होत आहे. झाडांची जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणात होत आहेत. गाय, कडुलिंबाची झाडे आता नाहीशी झाली आहेत. केवळ तुळस पहावयास मिळते. गायीचे गोमूत्र, शेण, दुधामध्ये तसेच कडुलिंबाच्या व तुळशीच्या झाडांमध्ये फार मोठी ताकद आहे. या तिन्ही गोष्टींची जोपासना करणाऱ्याच्या घरातील माणूस आजारी पडत नाही. शिवाय, कोरोनासारखे आजार दूर राहतात.

विंचू चावल्यास धोत्र्याच्या पाल्याचा रस लावल्यास तत्काळ कमी होते. गोवर निघाली की, त्या बाळास शेळीचे दूध पाजल्यास उष्णतेने गोवर बाहेर पडून कमी होतो. आग्यापैन-नागविडा झाल्यास समदडीचा पाला दह्यात घालून कालवून पितळेच्या वाटीत ठेवून लावल्यास तत्काळ अंगातील आग कमी होते. खांडूक झाल्यास वाघाट्याचा पाला बारीक करून त्यात थोडे मीठ घालून दह्यामध्ये कालवून पट्टी बांधल्यास तत्काळ कमी होते. नखुरडे झाल्यास पिवळ्या फुलाच्या काटेपातराची पाने वाटून त्यात हळद घालायची व एरंडीच्या तेलामध्ये घालून पट्टी बांधायची ते तत्काळ कमी होते.

६० ते ७० रोगांवर आयुर्वेदिक उपचार...

जुलाब होत असल्यास सुंठ हिंग घालून वाटायचे. त्यात गूळ घालून लहान गोळ्या लिंबूच्या रसासोबत घेतल्यास तत्काळ कमी होते. अशा ६० ते ७० रोगांवर आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक वनस्पतींमुळे मी करीत होते. हत्तीबेटावर आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नवीन पिढीने या वनस्पती जतन करून ठेवून त्यांचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर उपचार करण्यासाठी करावा, असे आवाहनही राधाबाई पोतदार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.