शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बीएड सीईटीत गोंधळ; आधी म्हणाले परीक्षा कालच झाली, नंतर केले दुसऱ्या गावच्या केंद्रात नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:31 IST

बीएड प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख अन् केंद्र बदलामुळे विद्यार्थ्यांची धावाधाव

- गोविंद इंगळेनिलंगा (जि. लातूर) : बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंगा केंद्र असलेले जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथील केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा मंगळवारी होती, असे सांगितले असता या परीक्षार्थींचा गाेंधळच उडाला. दरम्यान, केंद्र प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा घेत असलेल्या कंपनीस तात्काळ माहिती दिली. कंपनीने निलंग्याऐवजी लातूर आणि आलमला येथील केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे सांगितल्याने या विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडाली.

बीएड प्रवेशपूर्व परीक्षेसाठी निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयाचे केंद्र आहे. त्यामुळे या केंद्रावर जिल्ह्यातून तसेच नांदेड जिल्ह्यातून जवळपास १२५ विद्यार्थी बुधवारी सकाळी परीक्षेसाठी आले होते. केंद्र प्रमुखांनी तुमची परीक्षा २५ एप्रिल रोजी होती असे ऑनलाईवर होते असे सांगितले. तेव्हा विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट दाखवून २६ रोजी परीक्षा असल्याचे म्हणाले. मात्र, केंद्रप्रमुखांनी परीक्षेस बसता येणार नाही, असे म्हणाल्याने गोंधळ उडाला. तेव्हा विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. निवेदनावर रोहिणी देशमुख, जान्हवी ढगे, दिगंबर गायकवाड, शाहिस्ता बेगम करीम बागवान, गजानन सोळुंके, वर्षाताई आडे, शितल गोरे, चैताली मंगनाळे, राजनंदिनी मोरे, सतीश मद्देवार, गिरीधर पंदीलवाड, लक्ष्मण पंदीलवाड, दीपक सोनकांबळे, आशुतोष जाधव, संदीप जाधव, शुभम पांचाळ, माधव बर्डे, चंद्रशेखर क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर यांच्यासह जवळपास १२५ विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

परीक्षार्थी झाले आक्रमक...या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा केंद्राकडे माेर्चा वळवित केंद्रप्रमुख आणि प्राचार्य एम. एन. कोलपुके यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी परीक्षार्थींची यादी तयार करुन परीक्षा घेण्याऱ्या संबंधित कंपनीस पाठविले. कंपनीने सदरील परीक्षा नंतर घेण्यात येईल, असे सांगितले. तेव्हा आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ये- जा करण्यासाठी झालेला खर्च द्यावा, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. अखेर कंपनीने विद्यार्थ्यांना परीक्षा आजच होती. मात्र, त्यासाठी लातूर व आलमला येथील केंद्रावर दोन तासांत पोहचण्यास सांगितले. तसेच परीक्षार्थींचा निलंग्याहून जाण्याचा प्रवास खर्च कंपनी करणार असेही सांगितले. तेव्हा परीक्षार्थींनी आलमला व लातूरकडे धाव घेतली.

परीक्षेसाठी सतत त्रास...परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्या ऐनवेळी असाच गोंधळ घालतात. त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्नही परीक्षार्थींनी केला.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर