शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

चिंता वाढली, रेणा प्रकल्पात केवळ २४ टक्के पाणीसाठा

By संदीप शिंदे | Updated: August 22, 2023 12:20 IST

पाणीसाठा कमी होत असून, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे.

रेणापूर : तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविली असून, रेणा मध्यम प्रकल्पासह, छोट्या-मोठ्या पाझर तलावातील पाणीसाठ्यात किंचत ही वाढ झालेली नाही. उलट पाणीसाठा कमी होत असून, भविष्यात पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रेणा प्रकल्पात केवळ २४ टक्केच पाणीसाठा आहे. तर शेतशिवारातील पिके सुकून चालली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

रेणापूर तालुक्यामध्ये रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी करण्यात आली. अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर आता पिके माना टाकून सुकू लागली आहेत. शेतकरी पावसाची देवासारखी वाट पाहत असून, उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी रेणापूर तालुक्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. तब्बल १४ वेळेस पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. तसेच बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली होती. मात्र, यंदा जुनपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मागील वर्षी १४ वेळेस पाण्याचा विसर्ग...रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर शहरासह तालुक्यातील ५० टक्के गावांना आणि अंबाजोगाई तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे १४ वेळेस पाण्याचा विसर्ग करावा लागला. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला असला तरी प्रकल्पात २४ टक्केच पाणीसाठा आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होणे शक्य नाही.

प्रकल्पात ५.०३२ दलघमी जिवंत पाणीसाठा...सध्या रेणा मध्यम प्रकल्पात जिवंत साठा ५.०३२ दलघमी, मृतसाठा १.१३४ दलघमी असे एकूण ६.१६२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, यंदा तालुक्यात व धरण क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्याने प्रकल्पात एकही टक्का पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे आहे त्याच पाण्यावर तहान भागवली जात आहे. अशीच स्थिती राहिली तर रेणापूर शहरासह व अंबाजोगाई तालुक्यातील या पाण्यावर अवलंबून असलेल्या लोकांना टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

पाण्याचा काटकसरीने वापर करावा...सध्या रेणा मध्यम प्रकल्पात ६.१३२ दलघमी म्हणजेच २४.४७ टक्के जलसाठा आहे. यंदा धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ झालेली नाही. आगामी काळातील पावसावरच पुढील गणित अवलंबून आहे. मध्यम प्रकल्पातून ज्या पाणीपुरवठा योजना आहेत, त्यांनी भविष्याचा विचार करावा. काटकसरीने पाण्याचा वापर करुन येणारी पाणीटंचाई टाळावे असे आवाहन रेना मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी