शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पीकविम्यासाठी ७२ तासांत अर्ज करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 17:18 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले  नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांना  हा अर्ज  भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

लातूर : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत. तर दुसरीकडे मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.

मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत देवणी, निलंगा, औसा, जळकोट, उदगीर व लातूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोयाबीन पिक पाण्यात वाहून गेले. शेंगांना झाडांवरच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे आता पीकविमा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र या योजनेत आता नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल का, याचीच चिंता वाटत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने पिक विमा अर्ज डाऊनलोड करून त्यावर माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अर्ज भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

त्यामुळे महसूल विभागांतर्गत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून रबी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी