शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पीकविम्यासाठी ७२ तासांत अर्ज करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 17:18 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले  नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांना  हा अर्ज  भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

लातूर : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत. तर दुसरीकडे मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.

मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत देवणी, निलंगा, औसा, जळकोट, उदगीर व लातूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोयाबीन पिक पाण्यात वाहून गेले. शेंगांना झाडांवरच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे आता पीकविमा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र या योजनेत आता नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल का, याचीच चिंता वाटत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने पिक विमा अर्ज डाऊनलोड करून त्यावर माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अर्ज भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

त्यामुळे महसूल विभागांतर्गत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून रबी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी