शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता ...

जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, ग्रामीण जनतेला शाश्वत पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आला आहे. मात्र, गावात नळ जोडणी करीत असताना पूर्ण करण्यात आलेल्या नळजोडण्यांचे काम तांत्रिकदृष्टया योग्य आहे, याबाबत बाह्य स्त्रोत्रांकडून ऑडीट करुन घेणेही आवश्यक आहे. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्हयांना वॉटरग्रीड योजनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. जि.प.चे सीईओ गोयल यांनी लातूरमध्ये यावर्षी ९२ हजार नळजोडण्यांपैकी ८६ हजारहून अधिक नळ जोडणीचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती सादरीकरणादरम्यान दिली.

प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी : राज्यमंत्री संजय बनसोडे

मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नळ जोडणी करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.जल जीवन मिशन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात सुलभता यावी यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याचे प्रस्तावित असून लवकरच याबाबत पूर्तता करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

आमदार धीरज देशमुख यावेळी म्हणाले, लातूर जिल्हयात दरवर्षी पाऊस कमी पडल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात पाण्याची क्षमता कशा पध्दतीने वाढविता येईल याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे.