शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता ...

जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, ग्रामीण जनतेला शाश्वत पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आला आहे. मात्र, गावात नळ जोडणी करीत असताना पूर्ण करण्यात आलेल्या नळजोडण्यांचे काम तांत्रिकदृष्टया योग्य आहे, याबाबत बाह्य स्त्रोत्रांकडून ऑडीट करुन घेणेही आवश्यक आहे. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्हयांना वॉटरग्रीड योजनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. जि.प.चे सीईओ गोयल यांनी लातूरमध्ये यावर्षी ९२ हजार नळजोडण्यांपैकी ८६ हजारहून अधिक नळ जोडणीचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती सादरीकरणादरम्यान दिली.

प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी : राज्यमंत्री संजय बनसोडे

मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नळ जोडणी करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.जल जीवन मिशन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात सुलभता यावी यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याचे प्रस्तावित असून लवकरच याबाबत पूर्तता करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

आमदार धीरज देशमुख यावेळी म्हणाले, लातूर जिल्हयात दरवर्षी पाऊस कमी पडल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात पाण्याची क्षमता कशा पध्दतीने वाढविता येईल याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे.