शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीच्या नावाखाली पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईस ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

लातूर : गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन, लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, बहुतांश ...

लातूर : गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाईन, लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, बहुतांश शेतक-यांच्या तक्रारींची पीकविमा कंपनीने दखलही घेतली नसल्याचे दिसून येत आहे, तर जवळपास ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले. केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर करुन त्याचे वाटप केले जात आहे.

गत खरीप हंगामात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाल्याने चांगले शेती उत्पादन मिळेल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, मुग, उडीद तसेच सोयाबीन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. तत्पूर्वी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील १० लाख ४४ हजार शेतक-यांनी अर्ज करुन ४९ कोटी ७४ लाखांचा विमा हप्ता भरला होता. दरम्यान, नुकसानभरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यामुळे पीकविमा भरलेल्या आणि नुकसानग्रस्त शेतक-यांनी आपल्या सोयीनुसार ग्रामसेवक, तलाठी तसेच पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे शेतक-यांचे डोळे नुकसानभरपाईच्या मदतीकडे लागले. परंतु, वास्तवात पीकविमा कंपनीने १ लाख १६ हजार शेतक-यांचे अर्ज आल्याचे सांगून त्यातील ८ हजार शेतक-यांचे अर्ज अपात्र ठरविले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अनुषंगाने जिल्ह्यातील केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापोटी आतापर्यंत ७६ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. वास्तविक पहाता, जिल्ह्यातील १० लाख ४४ हजारपैकी केवळ १ लाख ८ हजार शेतक-यांनाच मदत मिळत असल्याने उर्वरित तक्रारी अर्ज गायब झाले कुठे असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

एकाला १२ हजार तर दुस-याला ३ हजार...

नुकसानीच्या तक्रारीनुसार पंचनामा करण्यात आला. मात्र, एकाच गटातील शेतक-याला नुकसानभरपाई पोटी १२ हजार तर दुस-या शेतक-याला ३ हजार रुपये मदत पीकविमा कंपनीकडून देण्यात आली आहे. वास्तविक पहाता, किमान एकाच गटात समान क्षेत्रावर पेरणी केलेल्या शेतक-यांना समान नुकसान भरपाई मिळायला हवी की नाही, असा सवाल शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

५० ते ६० तक्रारी दाखल...

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसाअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतक-यांना ८८ कोटी २६ लाख मंजूर झाले. आतापर्यंत ७६ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. असमान पैश्याबाबत आतापर्यंत ५० ते ६० शेतक-यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांना समजावून सांगण्यात येत आहे, असे पीकविमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक संतोष भोसले यांनी सांगितले.

अद्यापही मदत मिळाली नाही...

तक्रारीनुसार पंचनामा झाला. दरम्यान, आम्ही कृषी विभागासह प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु, अद्यापही नुकसानभरपाईपोटी मदत मिळाली नाही. त्यामुळे आता तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न असल्याचे कव्हा येथील शेतकरी संतोष सुलगुडले यांनी सांगितले.