शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे

By संदीप शिंदे | Updated: March 7, 2024 18:52 IST

राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही.

औसा (जि. लातूर) : देशात व राज्यात सत्तेचा दुरुपयोग केला जात असून, केंद्र शासनाची तर एकाधिकारशाही सुरु आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व घटकांना भोगावे लागत आहेत. या एकाधिकारशाहीला सत्तेवरुन हटवावे लागणार आहे. त्यासाठीच मी तुमच्याकडे आलो असून, या एकाधिकारशाहीचा तुम्हालाच हिशेब करावा लागेल, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे गुरुवारी केले.

औसा शहरात आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर खा. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, खा. ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे, आ. कल्याण पाटील, आ. कैलास पाटील, माजी आ. दिनकर माने, संतोष सोमवंशी, जयश्री उटगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अमर खानापुरे, शेषेराव पाटील आदींची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही माझे कुटूंब आहात म्हणून मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही. मी हे केले, मी ते केले असे म्हंटले नाही. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे त्यावेळी तुमचे सरकार होते, जनता जनार्दनाचे सरकार होते. तुम्हाला विकसित देशाची गॅरंटी देणारे तुमची गॅरंटी घेतील का. घेतली तर निवडणूकीपूरती घेतील. २०४७ चे स्वप्न ते दाखवत आहेत. तोपर्यंत आपण राहाणार आहोत का? कोण जाणे, आजचे काय? शेतकरी हैराण आहेत, त्याची राज्य व केंद्र सरकारला काहीच चिंता नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

औशाचे दोनवेळा शिवसेनेकडे प्रतिनिधीत्व...धाराशिवचा खासदार आणि औशाचा आमदार आपलाच असेल. गत निवडणूकीमध्ये त्यांनी गयावया केल्याने औशाची जागा सोडली होती. आगामी निवडणूकीत असे होणार नाही. औसा मतदारसंघातून दोनवेळा दिनकर माने निवडून आले आहेत. लोकसभा आणि विधानसभेत आपले उमेदवार निवडून येतील, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचे दोन तुकडे करणाऱ्यांना धडा शिकवा...धाराशिवची जागा आपण जिंकूच, तसेच औसा विधानसभेवरही शिवसेनेचा झेंडा फडकेल. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे सांगत खा. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे यांचीही यावेळी भाषणे झाली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlaturलातूर