शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. ...

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. खाजगी रुग्णालयाच्या सहभागातून बेडची संख्या वाढविली जाईल. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता करण्यात आली असून, येणाऱ्या काळात लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली.

रुग्णसंख्येचा वाढता वेग यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. परंतु, प्रशासन, पोलीस, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास आला असल्याचे सांगत पालकमंत्री पत्रपरिषदेत म्हणाले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, मृत्यूचे प्रमाण १.७४ टक्के आहे.

येणाऱ्या २० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशावेळी शहरातील दोनशे खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी. प्रत्येकाने किमान ५ बेड वाढवावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १५० बेड वाढविण्यात आले आहेत. एमआयटीसी संचलित रुग्णालयात कोविड सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे. जिल्ह्याला ३० मे. टन ऑक्सिजनची गरज आहे आणि आपली जिल्ह्याची साठवणूक क्षमता ५४ मे. टन आहे. ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध आहेत. तसेच आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत.

रेमडेसिविरचा गरजेनुसार वापर...

रेमडेसिविर व अन्य औषधांचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी अनावश्यक वापर होत असल्याने तुटवडा निर्माण होऊन गरजूंना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कधी वापरावे, याची नियमावली तयार करण्यास सांगितली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी सूचना केल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लॉकडाऊनची अंमलबजावणी

सर्व घटकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाला व पोलिसांना दिले आहेत. जनतेनेही त्यासाठी पुढाकार घ्यावा.