शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. ...

जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, परिस्थिती नियंत्रणात

लातूर : कोविड-१९ प्रादुर्भाव नियंत्रण आणि उपचारासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे. खाजगी रुग्णालयाच्या सहभागातून बेडची संख्या वाढविली जाईल. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, रेमडेसिविरच्या वापरासाठी आचारसंहिता करण्यात आली असून, येणाऱ्या काळात लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली.

रुग्णसंख्येचा वाढता वेग यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. परंतु, प्रशासन, पोलीस, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास आला असल्याचे सांगत पालकमंत्री पत्रपरिषदेत म्हणाले, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, मृत्यूचे प्रमाण १.७४ टक्के आहे.

येणाऱ्या २० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशावेळी शहरातील दोनशे खाजगी रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी. प्रत्येकाने किमान ५ बेड वाढवावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १५० बेड वाढविण्यात आले आहेत. एमआयटीसी संचलित रुग्णालयात कोविड सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे. जिल्ह्याला ३० मे. टन ऑक्सिजनची गरज आहे आणि आपली जिल्ह्याची साठवणूक क्षमता ५४ मे. टन आहे. ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर निर्बंध आहेत. तसेच आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरही उपलब्ध आहेत.

रेमडेसिविरचा गरजेनुसार वापर...

रेमडेसिविर व अन्य औषधांचा आवश्यकतेनुसार पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी अनावश्यक वापर होत असल्याने तुटवडा निर्माण होऊन गरजूंना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेमडेसिविर कधी वापरावे, याची नियमावली तयार करण्यास सांगितली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी सूचना केल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लॉकडाऊनची अंमलबजावणी

सर्व घटकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाला व पोलिसांना दिले आहेत. जनतेनेही त्यासाठी पुढाकार घ्यावा.