शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

ढग दाटून येतील अन् कोसळतीलही; २२ जून ते ६ जुलैपर्यंत पाऊस, पंचांग अभ्यासकांचा दावा

By हणमंत गायकवाड | Updated: June 20, 2023 18:49 IST

रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले असून आता आर्द्रा नक्षत्रावर पेरण्या कराव्या लागणार आहेत

लातूर : रोहिणी नक्षत्रासह मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, पेरण्या कधी होतील याची चिंता पडली आहे. दरम्यान, रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी २१ जूनपासून निघणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात चांगला पाऊस असल्याचा दावा पंचांग अभ्यासकांनी केला आहे. परिणामी, या नक्षत्राच्या पावसावर पेरण्या होतील, अशी अपेक्षा आहे.

मृग नक्षत्र २१ जून रोजी संपत आहे. २२ जूनपासून आर्द्रा निघत आहे. ६ जुलैपर्यंत हे नक्षत्र राहणार आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत चांगला पाऊस होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसावरच पेरण्या होतील. कारण त्यापुढे निघणारे नक्षत्र पुनर्वसू आहे. या नक्षत्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. ६ जुलै ते २० जुलैपर्यंत असणाऱ्या पुनर्वसू नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पेरण्यानंतर अशाच पावसाची गरज असते. तो पाऊस या नक्षत्रात पडणार आहे, असेही पंचांग अभ्यासक आनंद तिवारी यांनी सांगितले.

२० जुलैनंतर पुष्य नक्षत्र निघते. या नक्षत्रातही चांगला पाऊस असून, ३ ऑगस्टपर्यंत या नक्षत्राचा कालावधी आहे. मोठा पाऊस या नक्षत्रात अपेक्षित आहे. पंचांगकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आर्द्रा, पुष्य आणि आश्लेषा हे तीन नक्षत्र मोठे नक्षत्र असून, चांगला पाऊस या तिन्ही नक्षत्रात आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पुनर्वसू नक्षत्रात आहे. पहिले दोन  कोरडे, त्यानंतरच्या आर्द्रा नक्षत्र जोरदार पाऊस होणार असून, पुनर्वसू नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्यानंतर निघणाऱ्या पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रात जोरदार पाऊस असल्याचे पंचांग अभ्यासक तिवारी यांनी सांगितले.

आर्द्रा, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रात मोठा पाऊसपुष्य आणि आश्लेषा नक्षत्राचा कालावधी जुलै महिन्यात आहे. या महिन्यात मोठा पाऊस होईल, अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यातही बऱ्यापैकी पावसाचा अंदाज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पेरण्या होऊन खरिपाची पिके जोमात येऊ शकतात.

चिंतेचे काही कारण नाहीरोहिण्या आणि मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे. एक नक्षत्रवगळता सगळ्या नक्षत्रात चांगला पाऊस आहे. पुनर्वसू नक्षत्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. ढग दाटून येतील आणि कोसळतीलही.- आनंद तिवारी, पंचांग अभ्यासक

 

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी