शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत डीपी जळाल्याने चांदोरीचे नागरिक १५ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST

निलंगा : तालुक्यातील चांदोरी येथील विद्युत डीपी जळाल्यामुळे गाव १५ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे ...

निलंगा : तालुक्यातील चांदोरी येथील विद्युत डीपी जळाल्यामुळे गाव १५ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. दुरुस्तीची सातत्याने मागणी करुनही त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

निलंगा तालुक्यातील चांदोरी हे साडेतीन हजार लोकसंख्येचे आणि ८०० उंबरठ्यांचे गाव आहे. गावच्या वीजपुरवठ्यासाठी तीन विद्युत डीपी आहेत. मात्र, १५ दिवसांपूर्वी यातील दोन डीपी जळाल्या आहेत. परिणामी, संपूर्ण गाव अंधारात आहे. गावचा वीजपुरवठा बंद झाल्याने गावातील पिठाच्या गिरण्याही बंद आहेत. त्यामुळे दळण कोठून आणायचे, असा प्रश्न महिलांपुढे निर्माण झाला आहे. याशिवाय कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु, वीज नसल्याने मोबाईल चार्जिंगचीही सोय नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडित असल्याने गावातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील आबालवृद्धांना शेतातून घागरीने पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे विंचू, किड्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ही समस्या महावितरणच्या अधिका-यांकडे मांडण्यात आली आहे, परंतु अद्यापही डीपी बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

लवकरच डीपी बसविला जाईल...

चांदोरी गावातील विद्युत डीपी जळाल्याने त्याचा अहवाल तयार करून मुख्य कार्यालयाला पाठविला आहे. लवकरच विद्युत डीपी उपलब्ध होईल. त्यानंतर तत्काळ बसविण्यात येईल आणि वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.

- एस.एस. देवडे, सहायक अभियंता.

गावात विविध समस्या...

गावातील डीपी जळाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. परंतु, अद्यापही महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही. परिणामी, गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याशिवाय, पिठाच्या गिरण्याही बंद आहेत, असे गावातील नागरिकांनी सांगितले.