शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

काेराेनाकाळात बालविवाह वाढले, विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

काेराेना काळात अर्थकारण पूर्णत: काेलमडले आहे. याच काळात अल्प खर्चात लग्न उरकण्याला प्राधान्य देण्यात आले. गावा-गावात माेठ्या प्रमाणावर बालविवाह ...

काेराेना काळात अर्थकारण पूर्णत: काेलमडले आहे. याच काळात अल्प खर्चात लग्न उरकण्याला प्राधान्य देण्यात आले. गावा-गावात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडले. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेम प्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे. तर दाेन कुटुंबातील आपसात असलेले नातेसंबंधही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात उपवर झालेल्या मुलींचे लग्न उरकण्याची प्रथा आजही आहे. यामध्ये अज्ञात हे प्रमुख कारण आहे. शिवाय आर्थिक अडचणीतून या बालविवाहाला प्राधान्य दिले जाते. आपल्यावरील भार कमी करण्याच्या मानसिकतेतून अनेक पालक आपल्या मुलींचा विवाह वय नसतानाही लावून देतात. यातील ३५ बालविवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे.

पटसंख्या कमी झालेली मुली मग गेल्या कुठे...

सध्याला सुुरू झालेल्या शाळांमध्ये ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३५ हजार मुलींची तर १ लाख ७५ हजार मुलांची संख्या आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ६ हजार ५०० च्या घरात आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न आता शाळांना पडला आहे.

अल्पवयीन मुलींच्या गळ्यात आता मंगळसूत्र...

अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र यानंतरही काही पालकांकडून आपल्या मुलींचा विवाह पार पाडला जात असल्याचे दिसून येत आहे.

परिणामी, उदगीर तालुक्यातील एका गावात असाच बालविवाह राेखण्यात बालसंरक्षण विभागाला यश आले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण...

बालविवाह पार पाडण्यात आर्थिक अडचणी, विवंचना हेच प्रमुख कारण असल्याचे समाेर आले आहे. यात प्रामुख्याने बालविवाह उरकले जात आहेत.

अल्पवयीन मुलींना पहिल्यांदाच आलेले स्थळ कसे नाकारायचे, या मानसिकतेतून पालक नकार देत नाहीत. दारात आलेला पाहुणा कसा परत करायचा...यातून हे बालविवाह पार पाडले जात आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये १७ आणि जानेवारी ते १५ जुलै २०२१ अखेर १८ बालविवाह झाल्याची नाेंद आहे. हे विवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे. यासाठी गावपातळीवर बालसंरक्षण समित्यांची स्थापना करण्यात येत आहे.

- धम्मानंद कांबळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, लातूर.

ज्या कुटुंबात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिवाय, आर्थिक अडचणी असलेल्या कुटुंबात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडतात. स्थलांतरीत कुटुंबात अशा प्रकारचे विवाह हाेत असल्याचे समाेर आले आहे. केवळ अज्ञान हेच प्रमुख कारण बालविवाहासाठी पाेषक ठरले आहे.

- गणपतराव तेलंगे, लातूर.