शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात बालविवाह वाढले, विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

काेराेना काळात अर्थकारण पूर्णत: काेलमडले आहे. याच काळात अल्प खर्चात लग्न उरकण्याला प्राधान्य देण्यात आले. गावा-गावात माेठ्या प्रमाणावर बालविवाह ...

काेराेना काळात अर्थकारण पूर्णत: काेलमडले आहे. याच काळात अल्प खर्चात लग्न उरकण्याला प्राधान्य देण्यात आले. गावा-गावात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडले. गावपातळीवर बालविवाह पार पाडण्यासाठी अल्पवयीन प्रेम प्रकरण हे नवे कारणही पुढे आले आहे. तर दाेन कुटुंबातील आपसात असलेले नातेसंबंधही कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात उपवर झालेल्या मुलींचे लग्न उरकण्याची प्रथा आजही आहे. यामध्ये अज्ञात हे प्रमुख कारण आहे. शिवाय आर्थिक अडचणीतून या बालविवाहाला प्राधान्य दिले जाते. आपल्यावरील भार कमी करण्याच्या मानसिकतेतून अनेक पालक आपल्या मुलींचा विवाह वय नसतानाही लावून देतात. यातील ३५ बालविवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे.

पटसंख्या कमी झालेली मुली मग गेल्या कुठे...

सध्याला सुुरू झालेल्या शाळांमध्ये ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३५ हजार मुलींची तर १ लाख ७५ हजार मुलांची संख्या आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ६ हजार ५०० च्या घरात आहे. पटसंख्या कमी झालेल्या मुली नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न आता शाळांना पडला आहे.

अल्पवयीन मुलींच्या गळ्यात आता मंगळसूत्र...

अल्पवयीन मुलींचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र यानंतरही काही पालकांकडून आपल्या मुलींचा विवाह पार पाडला जात असल्याचे दिसून येत आहे.

परिणामी, उदगीर तालुक्यातील एका गावात असाच बालविवाह राेखण्यात बालसंरक्षण विभागाला यश आले. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण...

बालविवाह पार पाडण्यात आर्थिक अडचणी, विवंचना हेच प्रमुख कारण असल्याचे समाेर आले आहे. यात प्रामुख्याने बालविवाह उरकले जात आहेत.

अल्पवयीन मुलींना पहिल्यांदाच आलेले स्थळ कसे नाकारायचे, या मानसिकतेतून पालक नकार देत नाहीत. दारात आलेला पाहुणा कसा परत करायचा...यातून हे बालविवाह पार पाडले जात आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये १७ आणि जानेवारी ते १५ जुलै २०२१ अखेर १८ बालविवाह झाल्याची नाेंद आहे. हे विवाह राेखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आले आहे. यासाठी गावपातळीवर बालसंरक्षण समित्यांची स्थापना करण्यात येत आहे.

- धम्मानंद कांबळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, लातूर.

ज्या कुटुंबात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिवाय, आर्थिक अडचणी असलेल्या कुटुंबात माेठ्या प्रमाणावर बालविवाह पार पडतात. स्थलांतरीत कुटुंबात अशा प्रकारचे विवाह हाेत असल्याचे समाेर आले आहे. केवळ अज्ञान हेच प्रमुख कारण बालविवाहासाठी पाेषक ठरले आहे.

- गणपतराव तेलंगे, लातूर.