शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार देत आहेत कर्करोगाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 19:22 IST

कर्करोग झालेल्या रूग्णांनी औषधोपचाराबरोबरच ध्येय, इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना ठेवल्यास या आजारातून मुक्तता मिळते.

ठळक मुद्देआजार झाला म्हणून चिंताग्रस्त न राहता योद्धा म्हणून त्याचा मुकाबला करायोग्य वेळी निदान झाल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

- आशपाक पठाण 

लातूर : महाराष्ट्रात कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण मागील दहा वर्षांपासून दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बदलती जीवनशैली, नकारात्मक विचार, वाढते धुम्रपान, शारीरिक कष्टाचा अभाव, राग, द्वेष, एकटेपणा वाढत असल्याने याच गोष्टी कर्करोगाला पूरक ठरत आहेत. कर्करोग झालेल्या रूग्णांनी औषधोपचाराबरोबरच ध्येय, इच्छाशक्ती आणि सकारात्मक भावना ठेवल्यास या आजारातून मुक्तता मिळते. त्यामुळे आजार झाला म्हणून चिंताग्रस्त न राहता योद्धा म्हणून त्याचा मुकाबला करा, असे अमरावती येथील जीवनशैली व आरोग्य विषयाचे अभ्यासक डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले.

मागील वर्षांपासून अहमदनगर येथील आरंभ व अमरावतीच्या प्रवास संस्थेच्या पुढाकारातून डॉ. अविनाश सावजी हे कॅन्सर प्रबोधन यात्रा काढतात. यावर्षी २ फेब्रुवारीला निघालेली यात्रा बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात गेली. यात्रेच्या माध्यमातून कर्करोग झालेल्या रूग्णांचे मनोबल वाढविणे आणि आजारापासून दूर राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर प्रबोधन केले जात असल्याचे सांगत डॉ. सावजी म्हणाले, कॅन्सरबाबत लोकांच्या मनामध्ये भीती आहे़ मागील दहा वर्षांपासून याचे प्रमाण वाढत आहे. सामान्य लोक जागरूक व्हावेत, योग्य वेळी निदान झाल्यावर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे जीवनशैलीत थोडासा बदल आणि उपचार घेत असताना स्वत:मध्ये ध्येय आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.

या गोष्टी देतात कर्करोगाला बळ...शहरी भागात कष्टाच्या सवयी कमी झाल्या आहेत. बैठी जीवनशैली, वाढते वजन, बीडी, सिगारेट, तंबाखू आदी प्रकारचे व्यसन आरोग्याला हानीकारक आहेत़ शेतीत रसायनांचा वापर, टूथपेस्ट, कॉस्मेटिक, फवारणी केलेल्या पालेभाज्या, घराचा केमिकलयुक्त रंग या बाबी कर्करोगाला खतपाणी घालत आहेत. जगण्यामध्ये आलेली नकारात्मकता, भावना, राग, द्वेष, एकटेपणा वाढत चालला आहे. व्यसनाबरोबरच या गोष्टीही कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

पुरूषांमध्ये तोंडाचा तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग...आपल्याकडे पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर सर्वाधिक आढळून येत आहे़ तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर वाढत चालला आहे. पूर्वी हा आजार ६० ते ७० वर्षे वयोगटात आढळून यायचा़ आता त्याचे वयोमान ३० ते ३५ वर्षांवर आले आहे़ यापासून दूर रहायचे असेल तर धुम्रपान, व्यसनाबरोबरच आहार, विहार, आचार, विचार बदलणे आवश्यक आहे.

कॅन्सर योद्धांनी साधला सात हजार विद्यार्थ्यांशी संवाद...प्रबोधन यात्रेत कॅन्सर झालेले व त्यातून बरे झालेल्या रूग्णांनी मराठवाड्यातील विविध शाखेच्या वैद्यकीय महाविद्यालये, पोलीस प्रशिक्षण केंद्र, शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात चार कॅन्सर योद्धांनी आपल्याला कोणत्या सवयीमुळे हा आजार बळावला आणि यातून कसे बरे झालो याची माहिती दिली. यातून स्वत:ला व कुटुंबाला झालेला त्रास सांगितल्याने अनेकांच्या मनात या आजाराविषयी जागृती झाली आहे.

शेवटच्या टप्प्यात काळजी महत्त्वाची...एखाद्या रूग्णाला अंतिम टप्प्यात आजार असल्याचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा रूग्णांना त्रास कमी व्हावा. यासाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या प्रयास व आरंभ या दोन संस्था कार्यरत असल्याचेही डॉ.अविनाश सावजी यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टरlaturलातूर