शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

उदगीरमध्ये दोन तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी ...

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास हे आंदोलन झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शेतकरी नेते रंगा राचुरे, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, अजित शिंदे, किरण पवार, अमोल कांडगिरे, रामराव बिरादार, विनोद सुडे, विजयकुमार चवळे, ईश्वर समगे, सद्दाम बागवान, बालिका मुळे, अविनाश गायकवाड, नंदकुमार पटणे, ज्ञानेश्वर पाटील, श्रीनिवास एकुर्केकर, शेख महेबूब, धनाजी मुळे, दत्ता काकडे आदींच्या सह्या आहेत.

शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या...

मागील ७२ दिवसांपासून देशातील शेतकरी गाजीपूर सीमा, टिकरी सीमा, सिंधू सीमेवर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार त्याची दखल न घेता बॅरिकेड उभे करून, रस्ते खोदून, भिंती बांधून व काटेरी तारांचे कुंपण करून शेतकऱ्यांना कैद्याप्रमाणे वागणूक देत आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा महाराष्ट्रातील शेतकरी तीव्र निषेध करीत आहेत. वाढती महागाई, वाढलेले इंधनाचे दर, वाढती बेरोजगारी या बाबीवर शासनाने गांभीर्याने विचार करून सामान्य जनतेस दिलासा द्यावा. तसेच मंजूर केलेले तिन्ही शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.