शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उदगीरमध्ये दोन तास चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी ...

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास हे आंदोलन झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शेतकरी नेते रंगा राचुरे, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, अजित शिंदे, किरण पवार, अमोल कांडगिरे, रामराव बिरादार, विनोद सुडे, विजयकुमार चवळे, ईश्वर समगे, सद्दाम बागवान, बालिका मुळे, अविनाश गायकवाड, नंदकुमार पटणे, ज्ञानेश्वर पाटील, श्रीनिवास एकुर्केकर, शेख महेबूब, धनाजी मुळे, दत्ता काकडे आदींच्या सह्या आहेत.

शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या...

मागील ७२ दिवसांपासून देशातील शेतकरी गाजीपूर सीमा, टिकरी सीमा, सिंधू सीमेवर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार त्याची दखल न घेता बॅरिकेड उभे करून, रस्ते खोदून, भिंती बांधून व काटेरी तारांचे कुंपण करून शेतकऱ्यांना कैद्याप्रमाणे वागणूक देत आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा महाराष्ट्रातील शेतकरी तीव्र निषेध करीत आहेत. वाढती महागाई, वाढलेले इंधनाचे दर, वाढती बेरोजगारी या बाबीवर शासनाने गांभीर्याने विचार करून सामान्य जनतेस दिलासा द्यावा. तसेच मंजूर केलेले तिन्ही शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.