शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

झेडपी शाळांत नवोपक्रम केंद्र; खेड्यातील मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होणार प्रगल्भ!

By हरी मोकाशे | Updated: July 12, 2023 19:39 IST

लातूर जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

लातूर : सध्या जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये गुणवत्तेची स्पर्धाच आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आघाडीवर रहावेत. तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात म्हणून शासनाने जिल्ह्यातील २० शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रम केंद्र सुरु केले आहेत. त्यामुळे या शाळांतील मुले जवळपास २५६ प्रयोग तयार करुन अध्ययन करीत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अन् गणितीय क्रियांची माहिती वाढावी म्हणून शासनाच्या वतीने जिल्ह्यातील २० जिल्हा परिषद शाळांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रमशील केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, गणितीय क्रियांसाठीचे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यातून जवळपास २५६ प्रयोग तयार होतात. या केंद्रामुळे प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थी साहित्यकृती तयार करीत आहेत.

सात तालुक्यातील शाळांचा समावेश...भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड इनोव्हेशन सेंटर हे जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकूण २० जिल्हा परिषद शाळांमध्ये आहेत. त्यात गुडसूर, लोहारा (ता. उदगीर), महापालिका शाळा क्र. ९, शासकीय वसाहत, तांदुळजा, बोरी, वांजरखेडा, भोईसमुद्रगा (ता. लातूर), जवळगा, बोरोळ, देवणी (ता. देवणी), साकोळ, अंकुलगा राणी (ता. शिरुर अनंतपाळ), खरोळा, पानगाव (ता. रेणापूर), चाकूर, नळेगाव (ता. चाकूर), निटूर, राठोडा, माळेगाव (ता. निलंगा) या शाळांचा समावेश आहे.

इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते?...या केंद्रात इंद्रधनुष्य निर्मिती कशी होते, वीज कशी तयार होते, मॅग्नेटिक कार, साधे तारा यंत्र, एलईडी, चार पायांचा रोबाेट, ड्रोन, पवनचक्की अशा एकूण २५६ प्रयोगाचे साहित्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टीकोन वाढीस मदत होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव...ही प्रयोगशाळा अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात. प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठांतर कमी होण्यास मदत होत आहे.- डॉ. सतीश सातपुते, उपक्रमशील शिक्षक.

 

टॅग्स :laturलातूरzp schoolजिल्हा परिषद शाळाEducationशिक्षण