शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विवाहितेच्या खूनप्रकरणी सासरच्या ५ जणांवर गुन्हा; पती, सासऱ्यास अटक : संशय घेत केला छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 22:52 IST

सहा महिन्यांनंतर पुन्हा ती सासरी आली होती. संशयातून पती, भाया, जाऊ, सासू, सासऱ्यानी संगनमत करून विवाहितेला शनिवार, २३ सप्टेंबर राेजी रात्री ठार मारले.

किनगाव (जि. लातूर) : लग्नानंतर सासरच्या मंडळींनी छळ करून, संशय घेत राजेवाडी (ता. चाकूर) येथील विवाहितेचा खून केल्याप्रकरणी किनगाव पाेलिस ठाण्यात रविवारी सायंकाळी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, किनगाव ठाण्यात अंगद गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, कासारवाडी (ता. परळी वैजनाथ) येथील स्वातीचा विवाह राजेवाडी येथील गोविंद केदार याच्यासाेबत २००९ मध्ये झाला हाेता. दरम्यान, त्यांना पहिली मुलगी (वय ९), दुसरी मुलगी (६) आणि एक मुलगा (२) असे तीन अपत्य आहेत. लग्नापासून विवाहिता स्वाती गोविंद केदार (वय ३३) हिचा सासरच्या मंडळींनी छळ करून सातत्याने संशय घेतला. याला वैतागून ती काही दिवस माहेरी गेली होती. सहा महिन्यांनंतर पुन्हा ती सासरी आली होती. संशयातून पती, भाया, जाऊ, सासू, सासऱ्यानी संगनमत करून विवाहितेला शनिवार, २३ सप्टेंबर राेजी रात्री ठार मारले.

याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात अंगद बाबुराव गुट्टे (रा. कासारवाडी, ता. परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती गोविंद केदार, विष्णू केदार, सुमन केदार, जगन्नाथ केदार, कमलाबाई केदार (सर्व रा. राजेवडी) यांच्याविरुद्ध गुरनं. २३६ / २०२३ कलम ३०२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी पती, सासऱ्याला अटक केली आहे. तपास पोउपनि. तोटेवाड करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी