शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह, आत्महत्या की घातपात?

By संदीप शिंदे | Updated: January 6, 2024 11:49 IST

सायबर सेल व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच घटनेचा उलगडा होणार

- बालाजी कटकेरेणापूर ( जि. लातूर ) : रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील बेपत्ता तरुणाचा स्वतःच्या शेता शेजारील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अभय अनुरथ सूर्यवंशी ( २३ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही आत्महत्या की घातपात यावर कामखेडा गावात चर्चेला उधाण आले आहे. 

पोलिसांनी सांगितले, कामखेडा येथील अभय अनुरथ सुर्यवंशी (वय २३) हा रेणापूरातील शिवाजी महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षांत शिकत असून, ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मी कॉलेजला जात आहे, असे सांगून तो घरुन गेला. मात्र तो परत न आल्याने कुटूंबियांनी शोध घेतला. तसेच वडील अनुरथ सुर्यवंशी यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार दाखली केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार पांचाळ तर कर्मचारी सारूळे तपास करीत होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अभयचे चुलते अशोक सुर्यवंशी यांना मुलाच्या शेताशेजारी असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती रेणापूर पोलीस व बीट अंमलदार यांना दिल्यानंतर पंचनामा करुन रेणापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री रेणापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहे एन.आर. सारोळे करीत आहेत.

सायबर सेलकडून अहवाल येणार...अभय सुर्यवंशी हा फोनवर बोलत होता. त्यामुळे याची अधिक माहिती सायबर सेलकडून मागविण्यात आली आहे. सायबर सेल व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच घटनेचा उलगडा होणार असल्याचे पोह एन.आर. सारोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर