शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पीकविमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांचा तहसीलसमोर रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: December 28, 2022 19:15 IST

किसान सेना, शेतकऱ्यांचे रेणापुरात आक्रमक आंदोलन

रेणापूर : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा. अतिवृष्टी झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात याव, या मागणीसाठी किसान सेना व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून तहसील कार्यालयसमोरील रस्त्यावर अर्धा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पीकविमा कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गत खरीपात तालुक्यात सतत अतिवृष्टी, ढगफुटी झाली. तसेच यल्लो मोझॅक, गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. पीकविमा कंपनी व कृषी विभागाने पंचनामे केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाईचे दावे सादर केले. तसेच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद दाखविण्यात आली.

तद्नंतर अंतिम पीक आणेवारी ४८ टक्के जाहीर करण्यात आली. त्यानुसार ८० टक्के पीकविमा भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांपर्यंत सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच ज्यांनी ऑनलाईन तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, तसेच पैसेही मिळाले नाहीत, अशांच्या खात्यावर तात्काळ पीकविमा जमा करावा. तालुक्यातील १२ गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नुकसानीपोटी अनुदान जाहीर झाले. परंतु, ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. ते देण्यात यावे, या मागणीसाठी किसान सेनेच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोंळगे, राजकुमार नागरगोजे, उमाकांत गोडभरले, दिलीप बरुरे, अप्पा बरूरे, बालाजी बरुरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा