शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पीकविमा कंपनी कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांचा तहसीलसमोर रास्तारोको

By हरी मोकाशे | Updated: December 28, 2022 19:15 IST

किसान सेना, शेतकऱ्यांचे रेणापुरात आक्रमक आंदोलन

रेणापूर : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा. अतिवृष्टी झालेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात याव, या मागणीसाठी किसान सेना व शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून तहसील कार्यालयसमोरील रस्त्यावर अर्धा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पीकविमा कंपनीच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

गत खरीपात तालुक्यात सतत अतिवृष्टी, ढगफुटी झाली. तसेच यल्लो मोझॅक, गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. पीकविमा कंपनी व कृषी विभागाने पंचनामे केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाईचे दावे सादर केले. तसेच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद दाखविण्यात आली.

तद्नंतर अंतिम पीक आणेवारी ४८ टक्के जाहीर करण्यात आली. त्यानुसार ८० टक्के पीकविमा भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजारांपर्यंत सरसकट पीकविमा देण्यात यावा. तसेच ज्यांनी ऑनलाईन तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, तसेच पैसेही मिळाले नाहीत, अशांच्या खात्यावर तात्काळ पीकविमा जमा करावा. तालुक्यातील १२ गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नुकसानीपोटी अनुदान जाहीर झाले. परंतु, ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. ते देण्यात यावे, या मागणीसाठी किसान सेनेच्या वतीने बुधवारी येथील पीकविमा कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. त्यानंतर येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोंळगे, राजकुमार नागरगोजे, उमाकांत गोडभरले, दिलीप बरुरे, अप्पा बरूरे, बालाजी बरुरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा