शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बडे दिलवाला ! मुलाच्या विवाहाबरोबर केले २२ जणांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:28 IST

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देसंसारोपयाेगी साहित्याची दिली भेट

- आशपाक पठाणलातूर : इस्लाम धर्मात निकाह (विवाह) हा अत्यंत साध्या पद्धतीने करावा, अशी शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करीत, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून लातूरच्या सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर समाजातील २२ जोडप्यांचा विवाह लावून दिला. त्याचबरोबर, त्यांना संसारोपयोगी साहित्य भेट देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने काहींना मुला, मुलींच्या लग्नाची चिंता भेडसावत असताना, सरफराज मणियार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजू लोकांचा शोध घेतला. त्यात २२ जोडप्यांनी नोंदणी केली. कसलाही गाजावाजा न करता, अतिशय साध्या पद्धतीने रविवारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. हैद्राबाद येथील धर्मगुरू मौलाना सय्यद मोहम्मद महेमुद हुसैनी कादरी यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले, तसेच इस्लामची शिकवण आणि काळाची गरज पाहता, अशा प्रकारचे विवाहसोहळे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजूंना दिला मदतीचा हात...कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणारे अनेक कुटुंब संकटात सापडले. त्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोना ओसरत असताना मुलाच्या विवाहाबरोबर सामुदायिक विवाह सोहळा घेण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. २२ जणांची नोंदणी झाली, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून, रविवारी सकाळी ११ वाजता लातूर शहरातील ६० फूट रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाडी मंडळींची गैरसोय होऊ नये, यासाठी शेकडो स्वयंसेवक होते. उत्कृष्ट पद्धतीचे व्हेज, नॉनव्हेजचे जेवण देण्यात आले.

इस्लामची शिकवण...गरीब असो की श्रीमंत, सर्वांनी आपल्या मुलांचा विवाह साध्या पद्धतीने करावा, जेणेकरून कुणाच्याही पालकांना विवाह ही बाब त्रासदायक वाटणार नाही, अशी इस्लामची शिकवण आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सरफराज मणियार यांनी स्वखर्चातून २२ जोडप्यांचा निकाह लावून दिला. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेता आले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :laturलातूरmarriageलग्नsocial workerसमाजसेवक