शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले ...

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले आहे. अचानक वाहनला धक्का मारणे, यातून वाद घालणे आणि लुटण्याचा कट रचण्याचा प्रकार घडला आहे. यासाठी महामार्गावर आणि इतर ठिकाणी काेणी विनाकारण वाद काढत असेल, आपल्या वाहनाचा पाठलाग करत असेल तर सावध राहिले पाहिजे. एखाद्या ढाब्यावर चहा-नाश्त्यासाठी थांबणार असाल तर, तेथील परिस्थिती आणि वेळ पाहून थांबावे. अशावेळी आपला पाठलाग हाेण्याची शक्यता अधिक असते. पाेलिसांनी वाहन लुटण्याच्या, दराेड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र, मिरची पूड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेकांची झाली ठिकठिकाणी लूट...

आपण प्रवास करत आहात, बाजारपेठेत आणि बॅंक परिसरात काही व्यवहारानिमित्त वावरत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी आपल्याला काेणी गाेडगाेड बाेलत आहे का, काेणी जवळीकता साधून संवाद साधत असेल तर अधिक सावधानता बाळगली पाहिजे.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते...

१ जवळपास दीड लाखांची रक्कम एक पाेलीस कर्मचारी औसा राेडवरील बॅंकेतून घेऊन घराकडे निघाला हाेता. दुपारची वेळ हाेती, यावेळी एकजण म्हणाला, तुमच्या शर्टला काही तरी घाण लागली आहे. अशावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले. यावेळी दीड लाखांची राेकड पळविण्यात आली. यातील चाेरटे अद्याप हाती लागले नाहीत.

२ काही दिवसांपूर्वी चाकूर ते शिरूर ताजबंद मार्गावर पहाटेच्या वेळी एका ढाब्यावरून चहा घेऊन निघालेल्या प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना घडली हाेती. वाहनावर ठेवण्यात आलेल्या बॅगांची दाेरी कापून त्या बॅगा पळविण्यात आल्या. यामध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

काय काळजी घ्याल..?

आपण शहरासह बाजारपेठेत वावरताना संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. काेणी आल्यावर नजर ठेवून आहे का, याबाबत सावधानता बळगावी. प्रवासादरम्यान, काेणाही अनाेळखी व्यक्तीशी फारसा संवाद साधू नये, काेणी खाद्यपदार्थ देत असेल तर ते स्वीकारू नये. त्याचबराेबर चाैकात किंवा रस्त्यावर आपल्याशी काेणी विनाकारण हुज्जत घालत असेल, वाद घालत असेल तर समयसूचकता बाळगत सुरक्षित ठिकाण गाठावे. अशा वेळी समाेरचे चार-पाच जण आणि आपण एकटे असताे. त्याचवेळी आपणाला लुटण्याचा प्रयत्न केला जाताे.