शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

सावधान, १६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

लातूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने मे-जून महिन्यांत पाणी नमुने तपासण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत ...

लातूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने मे-जून महिन्यांत पाणी नमुने तपासण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत १६९९ नमुने तपासण्यात आले असून, त्यात २९४ नमुने दूषित आढळले आहेत. १६४ गावांमध्ये दूषित नमुने आढळले असून, ही गावे जोखीमग्रस्त म्हणून आरोग्य विभागाने नोंदविली आहेत. या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धिकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्लोरीनेशन आणि क्लोरीनवॉश ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्रांतर्गत, तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथरोग औषधी किट ठेवण्याच्या योजनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. शिवाय, जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवस क्लोरिनेशन आणि क्लोरीनवॉक विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

प्रत्येक गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी

प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची तपासणी मे-जून महिन्यांत करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यात १६७ नमुने तपासण्यात आले. त्यात ४२ नमुने दूषित आढळले.

औसा तालुक्यात १७६ नमुने तपासण्यात आले असून, १३ पाणी नमुन्यात दोष आढळले आहेत. ७.३९ टक्के पाणी नमुने या तालुक्यात दूषित आहेत.

चाकूर तालुक्यामध्ये २६८ नमुने तपासण्यात आले असून, ६६ नमुने दूषित आढळले असून, दूषित पाणी नमुन्यांची टक्केवारी २४.६३ टक्के आहे.

कोरोनामुळे नमुने घटले

लातूर जिल्ह्यात एकूण १६९९ नमुन्यांपैकी २९४ नमुने दूषित आहेत. त्याची टक्केवारी १७.३० टक्के आहे. दूषित आढळलेल्या पाणी नमुन्यांच्या स्रोतांचे शुद्धिकरण केले जात आहे.

देवणी १२, जळकोट ९, लातूर २१, निलंगा ५२, रेणापूर ७, शिरूर अनंतपाळ २४ आणि उदगीर तालुक्यात ४८ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

दूषित पाणी नमुने आढळलेल्या ग्रामपंचायतींना सतर्कतेबाबत आवाहन करण्यात आले असून, पाणी शुद्धिकरणासाठी नियमित क्लोरिनवॉश करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या

पावसाळ्यात जलजन्य आजार उद्‌भवतात. उलटी, जुलाब असे आजार होतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यातील दूषितपणा नाहीसा होतो.

खाद्यपदार्थ उघडे ठेवू नयेत. माशा बसून आजार होऊ शकतात. शिवाय, शिळे अन्नही खाऊ नये. ताजे गरम अन्न खावे.

जीएसबीए लॅबमध्ये १६७५ नमुने तपासण्यात आले. त्यात २८६ नमुने दूषित आढळले, तर जिल्हा लॅबमध्ये १६९९ पैकी १९४ नमुने दूषित आढळले आहेत.